शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत साठ्याकडे संथ वाटचाल

By admin | Updated: July 29, 2016 01:07 IST

औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे

औरंगाबाद : पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात धरणाच्या मृतसाठ्यात २५७ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. तरीदेखील मृतसाठ्यातील संपूर्ण तूट भरून निघण्यासाठी आणखी २३ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. त्यानंतरच धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी भरण्यास सुरुवात होईल. जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण मृतसाठ्यातच आहे. यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच धरणातील जिवंत साठा पूर्णपणे संपला होता. तेव्हापासून पिण्यासाठी आणि उद्योगांसाठी धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या मृतसाठ्याची पातळीही २६५ दलघमीने घटली होती. मात्र, जुलै महिन्यात सातत्याने पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणात नियमितपणे पाण्याची आवक होत आहे. महिनाभरात धरणात २५७ दलघमी पाण्याची आवक झाली आहे; पण तरीदेखील हे धरण जिवंत साठ्यात आलेले नाही. धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. गुरुवारी सकाळपर्यंत मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत पोहोचली. कडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणात गेल्या चोवीस तासांत १२ दलघमी पाण्याची आवक झाली. परिणामी मृतसाठ्यातील पातळी ७१५ दलघमीपर्यंत आली. मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी अजूनही २३ दलघमीची गरज आहे.