शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला.

औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला. महायुती व काँग्रेस आघाडीमध्ये औरंगाबादेतील लढत तुल्यबळ होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा फोल ठरवत खैरे यांनी दणदणीत विजय मिळविला. खैरे यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध प्रचारासह प्रचार यंत्रणा सतत गतिमान ठेवली. विशेषत: गंगापूर, कन्नड व वैजापूर या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. कन्नडवर लक्ष ठेवण्यासाठी पुत्र ऋषिकेश, वैजापूरसाठी पत्नी वैजयंती खैरे आणि गंगापूरवर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना खास नेमले होते. तिन्ही विधानसभा मतदारसंघांनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. पाटील यांना त्यांच्या कन्नडमधूनही मताधिक्य मिळू शकले नाही, यातच सर्व आले. शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, भाजपाचा असहकार आणि मतदारसंघाचा विकास करण्यात खैरे अपयशी ठरल्यामुळे मतदारांची नाराजी शिगेला पोहोचलेली होती. त्याचे पडसाद उद्धव ठाकरे यांच्या शहरातील सभेत उमटले. सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे मात्र, खैरे यांनी झटपट चक्रे हलविली. मुंबईहून स्थानीय लोकाधिकार समितीला पाचारण केले. प्रचाराची यंत्रणा नव्याने आखली. पक्षांतर्गत रुसवे फुगवे दूर करून मतदारांना अंतिम टप्प्यात आपल्या बाजूने कुशलतेने वळविण्यात ते यशस्वी ठरले. याशिवाय रिपब्लिकन नेते व कार्यकर्त्यांना दलित वसाहतींमधून नियोजनबद्ध पद्धतीने फिरविले. हे सर्व घडत असताना मोदीबद्दल मतदारांत वाढलेले आकर्षण खैरे यांनी ‘कॅश’ न केले असते तरच नवल. त्यासाठी खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र होर्डिंग्ज उभारून भाजपासह मतदारांची मने आपल्या बाजूने वळती केली. काँग्रेसचे नितीन पाटील यांनीही उमेदवारी अर्ज सादर करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. ‘व्हिसपर कॅपेंनिंग’ मध्ये पाटील यांनी सुरुवातीला आघाडी घेत, खैरे यांच्यावर मानसिक दडपण वाढविले होते. परंतु हे दडपण पाटील यांना शेवटपर्यंत टिकविता आले नाही. पाटील यांच्या कल्पनेतील मुस्लिम, मराठा व दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा फॅक्टर मूर्त स्वरूप घेऊ शकला नाही. खैरे यांची विजयाची परंपरा चौथ्या वेळेस रोखण्याचे काँग्रेस आघाडीचे मनसुबे मोदी लाटेने धुवून नेले. जिंकल्याचे कारण खैरे यांच्याविरुद्ध मतदारांत ‘अ‍ॅन्टिइन्कबन्सी’ होतीच; परंतु मोदी नावाच्या त्सुनामीचा त्यांनी खुबीने वापर करून घेतला. हरल्याचे कारण प्रचाराची अपुरी यंत्रणा, कार्यकर्त्यांचा अभाव. वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव. मतदारसंघ पिंजून काढण्यात आलेले अपयश. या कारणांमुळे मिळाला विजय 1 खैरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे मतदारसंघातील फीडबॅक मिळत गेला. त्यानुसार नियोजनात अनुरूप बदल करून प्रचार यंत्रणा गतिमानपणे राबविणे त्यांना शक्य झाले. 2 सेनेत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. सोबत महायुतीत आलेल्या रिपाइं कार्यकर्त्यांवर योग्य कामे सोपवून ती त्यांनी करवूनही घेतली.