शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 11, 2014 00:23 IST

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे.

शिरूरकासार: गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. पिके वाढीला लागली असतानाच हरिण, मोर, रानडुक्कर यांच्याकडून पिकांची नासधूस होत आहे. वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने तोंडचा घास पळवून नेल्या सारखी स्थिती शेतकऱ्यांवर ओढावली आहे. गणपतीच्या आगमनापासून तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसामुळे नद्या व ओढ्यांना पाणी आले होते. जागोजागी पाणीच पाणी साठल्याचे चित्र आजही तालुक्यात पहावयास मिळत आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. रानडुकरे कळपाने येऊन पिके उद्ध्वस्त करीत चालली आहेत. त्यांना प्रतिरोध केला असता ते हल्ला करत असल्याचे यापूर्वी अनेक वेळा समोर आल्याने शेतकरी भितीपोटी त्यांना प्रतिरोध करीत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत रानडुकरे धुमाकूळ घालून पिके उद्ध्वस्त करत चालले आहेत. रात्रीच्या किंवा सायंकाळच्यावेळी रानडुकरे कळपाने शेत परिसरात दाखल होतात. पायाने जमीन उकरून धुमाकूळ घालतात. यामुळे पिके उन्मळून खाली पडत आहेत. एकामागून एक डुकरे पळत असल्यामुळे पिके त्यांच्या पायदळी तुडविली जातात. रानडुकरे हल्ला करत असल्याच्या कारणावरून शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शकली लढवित आहेत. काही ठिकाणी ताराचे कुंपण केले आहे तर काही ठिकाणी दोऱ्या बांधलेल्या आहेत. मात्र याच्या मधूनही डुक्कर शेत परिसरात प्रवेश करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या समस्येशी दोन हात कसे करावेत? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पिके बहरात आली असताना त्याची नासधूस वन्य प्राण्यांमार्फत होत आहे. याची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांना विमाही मिळत नाही. याची दखल घेत शासनाने वन्य जीवांकडून पिकांची हानी झाली तर विमा द्यावा, अशी मागणी गोकुळ सानप यांनी पत्रकान्वये केली आहे. शिरूर तालुक्यातील रायमोहा, आव्हळवाडी, हटकरवाडी, भानकवाडी, धनगरवाडी, टाकळवाडी, येवलवाडी, वंजारवाडी, डिसलेवाडी, डोळेवाडी, दत्तनगर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात वन्य जीवांकडून नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा जिल्हा परिषदेने करावा व त्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी गोकुळ सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे. तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, त्याबाबत वन विभागाला सूचना द्यावेत, असेही सानप यांनी पत्रकात म्हटले आहे.(वार्ताहर)