शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सतरा हजार मतदार वाढले

By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे.

प्रसाद आर्वीकर, परभणीजिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत आगामी निवडणुकांत मतदारांची संख्या वाढणार आहे.मागील एक वर्षापासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणीला प्राधान्य दिले आहे. त्यातूनच मतदार जागृती कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रथमच राबविण्यात आला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीमुळे यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत चांगलीच वाढ झाली. या लोकसभा मतदारसंघात १० टक्क्याने मतदार वाढले होते. विशेष म्हणजे वेळोवेळी मतदार नोंदणी कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमातून दीड लाख नवीन मतदारांनी नोंदणी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतरही ९ ते ३० जून या काळात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयात नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. या मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या कार्यक्रमात १७ हजार ३६८ नवीन मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या आता १२ लाख ८६ हजार ५०५ एवढी झाली आहे. (प्रतिनिधी)परभणीत प्रतिसादजिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी परभणी विधानसभा मतदार- संघामध्ये ६ हजार ५८ मतदारांनी नव्याने नोंदणी केली. तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात ३५४५, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ३४९९ आणि पाथरी विधानसभा मतदार- संघात ४३५६ मतदार नव्याने यादीत समाविष्ट झाले आहेत.दीड लाख मतदारांची झाली वाढ मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला होता. प्रत्येक घरोघर जाऊन मतदारांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणी झाली. त्यामुळे १८ ते २० या वयोगटातील नवमतदार मोठ्या संख्येने मतदार यादीत समाविष्ट झाले होते.बोगस मतदारांचीही उडविली नावेमतदारयादीत अनेक मतदारांची नावे दोन वेळेस होती तर काही मतदार मयत झाल्यानंतरही त्यांची नावे यादीत शिल्लक होती. त्यामुळे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असे. जिल्हा प्रशासनाने अशी ८० हजार नावे मतदान यादीतून वगळली होती. विधानसभा मतदारसंख्यावाढीव एकूणजिंतूर३,१६,९३२३४५४३,२०,३८६परभणी२,७२,१४२६०५८२,७८,२००गंगाखेड३,५५,८४७३४९९३,५९,३४६पाथरी३,२४,२१६४३५६३,२८,५७२एकूण१२,६९,१३७१७,३६८१२,८६,५०५