शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या बळाअभावी सुरक्षेचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: December 15, 2015 23:29 IST

गजानन वाखरकर, औंढा दररोज भाविकांसह प्रवासी व व्हीआयपींची ये-जा सुरू राहत असल्याने पोलीस यंत्रणेला अक्षरश: वेठीस धरले जाते.

गजानन वाखरकर, औंढा देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या नागनाथ ज्योर्तिलिंगामुळे औंढा शहराला मोठे महत्त्व आहे. दररोज भाविकांसह प्रवासी व व्हीआयपींची ये-जा सुरू राहत असल्याने पोलीस यंत्रणेला अक्षरश: वेठीस धरले जाते. अशा स्थितीत औंढा ठाण्यात अपुरे बळ असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ७९ गावांचा समावेश व संवेदनशील असलेल्या ठाण्यामध्ये केवळ दोन अधिकारी व ४६ कर्मचारी असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यास दुहेरी काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. ठाणे हद्दीतील ७९ गावांमध्ये सेनगाव तालुक्यातील ९ तर हिंगोली ग्रामीणमधील २ गावांचा यामध्ये समावेश आहे. एक पोलीस निरीक्षक व एक सहाय्यक निरीक्षक यांची येथे नियुक्ती असून, पदोन्नतीने आलेले तात्पुरते अधिकारी येथे कामकाज पाहत आहेत. २०११ ते १२ मध्ये या ठाण्याची कर्मचारी संख्या ६२ एवढी होती. सध्या ही संख्या ४६ वर येऊन ठेपल्याने कामाचा मोठा ताण या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. औंढा हे तीर्थक्षेत्र असून सुरक्षेच्या यादीत हे ठिकाण मर्मस्थळ म्हणून अव्वल ठिकाणी आहे. अतिसंवदेनशील असणाऱ्या गावात नेहमीच या ना त्या कारणामुळे तणावाच्या घटना घडतात. अगदी राज्य रस्त्यालगत हे गाव असल्याने २४ तास येथे पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो. ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात, सिद्धेश्वर तलाव व तालुका कोषागार कार्यालयांत तीन अधिक एक गार्ड तैनात आहेत. यासाठी १२ कर्मचारी तेथेच लागतात. ठाण्यातील दैनंदिन कामकाजास १२ कर्मचारी व चार बीटमध्ये प्रत्येकी २ प्रमाणे ८ कर्मचारी काम करतात. शिवाय वायरलेसला २, न्यायालयात एक, २ चालक असे कर्मचारी नियमीत कामात गुंतलेले आहेत. (समाप्त)