शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

By admin | Updated: July 3, 2014 00:20 IST

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्ती मिळण्यासाठी शासनाने व महावितरण कंपनीकडून कृषि संजीवनी योजना-२०१४ राबण्यिात येत आहे.शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.कृषि संजीवनी योजना २०१४ या योजनेत चालू कृषीपंपधारकांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या एकूण थकबाकी पैकी निव्वळ ५० टक्के रक्कम एकरकमी आॅगस्ट २०१४ पर्यंत भरता येईल. अन्यथा ५० टक्के मुळ थकबाकीच्या रक्कमेत तीन मासिक हप्ते म्हणजे ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत उरलेली १० टक्के रक्कम भरता येईल. तसेच या योजनेत १ एप्रिल २०१४ पासूनची सर्व चालू बिले पूर्णपणे व ििनयमित भरणे आवश्यक आहे. अशा ग्राहकांना पुढील दोन त्रैमासिक बिलांमध्ये ५० टक्के माफी दिली जाणार आहे. ही रक्कम शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात मिळणार आहे.जिल्ह्यात मार्च २०१४ अखेर शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे. कृषि संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांनी ५० टक्के रक्कम १३१ कोटी ४७ लाख ४० हजार रुपये भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम टप्प्यात ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के म्हणजे ५२ कोटी ५८ लाख ९६ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के म्हणजे ३६ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ३६५ कोटी ३१ लाख ८३ हजार १९३ रुपये व्याज व दंडाची ७ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये म्हणजे ३७२ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये माफ होणार आहेत.या कृषि संजीवनी योजनेत सहभागी न होणाऱ्या ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येईल. त्यांना व्याज व दंड माफीचा फायदा मिळणार नाही. शेतीपंप वीज ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेचा जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकी भरावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता मासूळ यांनी केले. (वार्ताहर)बिलावरील व्याज व दंड होणार माफशेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे.