शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

वंचितमध्ये ‘आरएसएस’ची मंडळी!; खासदार एम्तियाज जलील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:57 AM

आमची ताकद आम्ही दाखवून देणार

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) निगडित माणसे शिरली आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबतची युती तोडली, असा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. दोन महिने आमच्यासोबत चर्चेचे गुºहाळ सुरू होते. दुसरीकडे काँग्रेससोबतही बोलणी सुरू ठेवली. आम्ही आता स्वबळावर निवडणूक लढविणार आहोत, असेही जलील यांनी जाहीर केले.

पत्रकार परिषदेत जलील यांनी मागील दोन महिन्यांत एमआयएम आणि वंचितमध्ये जागा वाटपासाठी कशी चर्चा झाली याची माहिती दिली. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर दोघेच चर्चा करीत होते. त्यांच्या सूचनांवरून आम्ही अगोदर ९८ व नंतर ७४ जागांची यादी वंचितला दिली. परंतु आम्हाला फक्त ८ जागा देण्यात आल्या. वंचितने आम्हाला किमान ४० ते ५० जागा दिल्या पाहिजेत. आमच्याकडे व्होट बँक नाही, असे वारंवार सांगण्यात येत आहे. राज्यात आमचे १५० नगरसेवक आहेत. आमची व्होट बँक किती हे विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशाराही जलील यांनी दिला.

मुळात सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वेगळी आघाडी तयार करण्यासाठी एमआयएम-वंचित बहुजन एकत्र आले. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डातील सदस्य आपली स्वत:ची ओळख मला करून देताना म्हणाले की, माझ्यामागे दोन कोटी लोक आहेत. मग अशा मंडळींनी मुख्यमंत्री व्हावे, असा टोलाही जलील यांनी मारला.ओवेसींना विचारून पत्रक काढलेआघाडी तोडण्यासंदर्भातील पत्र मी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची परवानगी घेऊनच प्रसिद्धीस दिले. वंचितचे प्रवक्ते, नेते काहीही बोलत आहेत. विनाकारण मला ‘व्हिलन’ठरविण्यात येत आहे. आजही वंचितची मंडळी बोलणी सुरू असल्याचे सांगत आहे. पण नेमकी कोणासोबत, हे सांगावे. अलीकडेच एमआयएमला १७ जागा दिल्याची अफवा पसरविण्यात आली. हा आकडा नेमका आला कोठून हे वंचितने सांगावे.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी