शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने परतूर तालुका ओलाचिंंब

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

परतूर : परतूर तालुक्यात चार- पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून एकाच दिवसात ९३ मि. मी. पाऊस झाला. अतिवृष्टीने नदीनाल्यांना पूर आला.

परतूर : परतूर तालुक्यात चार- पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून एकाच दिवसात ९३ मि. मी. पाऊस झाला. अतिवृष्टीने नदीनाल्यांना पूर आला. शेतात पाणी भरले आहे. तर दुधना नदी दुथडी भरून वाहत असल्याने निम्न दुधना सिंचन प्रकल्पात ५३ टक्के पाणी साठा झाला आहे.परतूर तालुक्यात आठवडाभरापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणीच झाले आहे. नदया, नाल्यांना पुर येऊन शेतात पाणी भरले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची पिक पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यात सर्वदूर हेच चित्र असून, यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. विशेषत: हा पाऊस जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी पोषक ठरला आहे. तर काही ठिकाणी अति पावसाने पिके धोक्यात आली आहेत. शेतातील बांधबंदीस्ती फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामिण भागातील रस्ते उखडले आहेत. परतूर सर्कलमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १२० मि. मी. ची नोंद झाली. तर आष्टी ९८ मि. मी. सातोना १०८ मि. मी., श्रीष्टी ९० मि.मी., वाटूर ४८ मि.मी. मिळून एका दिवसात सरासरी ९२.८० टक्के पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्याची सरासरी पासाची नोंद ३९१. ८० मि. मी. झाली आहे. पारडगाव: घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारीही या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्या नाल्यांना मोठा पूर आला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरला आहे. तर काही ठिकाणी अतिपावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.या पावसाने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, येथील आठवडी बाजारात ठिक ठिकाणी पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. (वार्ताहर) मंठा: तालुक्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थितीही नाजूक होती. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे पिकांना पुन्हा जीवदान मिळाले आहे. पावसामुळे बाजारपेठेतही चैतन्य आले आहे. सणा- सुदीत पाऊस पडल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. मंठा शहरासह तळणी, उस्वद, जयपूर, पांगरी गोसावी आदी भागात चांगला पाऊस झाला. कापूस, सोयाबीन पिके जोमात आहेत.नेर: जालना तालुक्यातील नेर परिसरातही या आठवड्यात चांगला पाऊस झाला. नदी, नाले, विहिरी, शेततळे पाण्याने तुडूंब भरले आहेत. या पावसामुळे परिसरातील पाणीटंचाईही काहीअंशी निकाली निघाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटला आहे. कापूस, सोयाबीन, मका तसेच भाजीपाल्यास पावसामुळे फायदा झाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (वार्ताहर)