शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?

By विकास राऊत | Updated: December 23, 2022 12:07 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत.

औरंगाबाद : नोव्हेंबर २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींनी औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत वाहनाने प्रवास केल्यानंतर त्या रस्त्याची दुरवस्था दूतावासाकडे अभिप्रायासह नोंदविली. आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील बांधकाम विभागाची लक्तरे टांगली गेली. १८२५ दिवसांपासून १४८ किमी रस्त्याचे काम सुरू आहे. जी-२० परिषदेनिमित्त येणारे पाहुणे अजिंठा लेण्यांना याच रस्त्याने जाणार असल्याने आता यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. 

रस्त्याचे अजूनही २० टक्के काम शिल्लक आहे. दोन वर्षांच्या कामाला पाच वर्षे लागत आहेत. २०१६ मध्ये २५ कोटींतून तात्पुरती डागडुजी करूनही या रस्त्याचे काम झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाने हर्सूल टी पॉइंटपासून रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला. हर्सूल ते जुना जकात नाक्यादरम्यान अडथळे आहेत. ते काम तातडीने शक्य नसल्याचे बोलले जाते. हर्सूल रुंदीकरणासाठी सोळा कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही. जी-२० पूर्वी हा रस्ता रुंद होणे गरजेचे आहे.

पाच वर्षांपासून का लागले ग्रहण?आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडून पोबारा केला. त्यानंतर तीन कंत्राटदारांना काम वाटून दिले. १ हजार कोटींची सुरुवातीची तरतूद होती. आता १५०० कोटींपर्यंत प्रकल्पाचा खर्च गेला. परिणामी, सिल्लोड बायपासचेही काम संथ सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे काम ठप्प आहे. निल्लोड फाटा ते सिल्लोडदरम्यान आठ किमी रस्त्याचे काम धुळे विभागाकडे आहे. ते खटोड कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आले. अद्याप कामाला गती नाही. अजिंठा लेण्यांमुळे पर्यटकांसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्ग महत्त्वाचा आहे. दीड हजार कोटी रुपये खर्चाचा काँक्रिट रस्ता पाच वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. हर्सूल टी पॉईंटसह पुढे रुंदीकरण व अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, चौका, बिल्डा, सिल्लोडपर्यंत कामे सुरू आहेत. अजिंठा घाटात संरक्षण कठडे व रस्ता बांधण्याचे काम प्रलंबित आहे.

प्रशासनाच्या बैठकीत काय ठरले?१४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला आदेश दिले. सिल्लोड ते फर्दापूर रस्त्याच्या कामास २० डिसेंबरपासून सुरुवात करावी. औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंत ६ ठिकाणची कामे पूर्ण करावीत, चौका घाटातील रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव मान्य झाला आहे, फुलंब्री येथील रस्त्यावरील काँक्रिटचे काम पूर्ण करावे, रस्त्यांवर जी-२०च्या अनुषंगाने वाहतूक नियम सूचनाफलक रेडियमसह लावणे, ३० डिसेंबरपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करावीत, आदी निर्देश आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी