शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

रस्ता १४८ किलोमीटर, काम १८२५ दिवसांपासून; औरंगाबाद ते अजिंठा महामार्ग कधी पूर्ण होणार?

By विकास राऊत | Updated: December 23, 2022 12:07 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत.

औरंगाबाद : नोव्हेंबर २०१५ मध्ये चीनच्या उपराष्ट्रपतींनी औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत वाहनाने प्रवास केल्यानंतर त्या रस्त्याची दुरवस्था दूतावासाकडे अभिप्रायासह नोंदविली. आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील बांधकाम विभागाची लक्तरे टांगली गेली. १८२५ दिवसांपासून १४८ किमी रस्त्याचे काम सुरू आहे. जी-२० परिषदेनिमित्त येणारे पाहुणे अजिंठा लेण्यांना याच रस्त्याने जाणार असल्याने आता यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे. 

रस्त्याचे अजूनही २० टक्के काम शिल्लक आहे. दोन वर्षांच्या कामाला पाच वर्षे लागत आहेत. २०१६ मध्ये २५ कोटींतून तात्पुरती डागडुजी करूनही या रस्त्याचे काम झाले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे १ हजार ५०० कोटींतून द्विपदरीनंतर चौपदरी करण्याची घोषणा करण्यासह काम सुरू होऊन पाच वर्षे झाली आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग विभागाने हर्सूल टी पॉइंटपासून रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला. हर्सूल ते जुना जकात नाक्यादरम्यान अडथळे आहेत. ते काम तातडीने शक्य नसल्याचे बोलले जाते. हर्सूल रुंदीकरणासाठी सोळा कोटींचा निधी अद्याप मिळालेला नाही. जी-२० पूर्वी हा रस्ता रुंद होणे गरजेचे आहे.

पाच वर्षांपासून का लागले ग्रहण?आंध्र प्रदेशच्या ऋत्विक एजन्सीने काम सोडून पोबारा केला. त्यानंतर तीन कंत्राटदारांना काम वाटून दिले. १ हजार कोटींची सुरुवातीची तरतूद होती. आता १५०० कोटींपर्यंत प्रकल्पाचा खर्च गेला. परिणामी, सिल्लोड बायपासचेही काम संथ सुरू आहे. काही ठिकाणी पुलांचे काम ठप्प आहे. निल्लोड फाटा ते सिल्लोडदरम्यान आठ किमी रस्त्याचे काम धुळे विभागाकडे आहे. ते खटोड कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आले. अद्याप कामाला गती नाही. अजिंठा लेण्यांमुळे पर्यटकांसाठी जळगाव-औरंगाबाद महामार्ग महत्त्वाचा आहे. दीड हजार कोटी रुपये खर्चाचा काँक्रिट रस्ता पाच वर्षांपासून पूर्ण झालेला नाही. हर्सूल टी पॉईंटसह पुढे रुंदीकरण व अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, चौका, बिल्डा, सिल्लोडपर्यंत कामे सुरू आहेत. अजिंठा घाटात संरक्षण कठडे व रस्ता बांधण्याचे काम प्रलंबित आहे.

प्रशासनाच्या बैठकीत काय ठरले?१४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला आदेश दिले. सिल्लोड ते फर्दापूर रस्त्याच्या कामास २० डिसेंबरपासून सुरुवात करावी. औरंगाबाद ते सिल्लोडपर्यंत ६ ठिकाणची कामे पूर्ण करावीत, चौका घाटातील रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव मान्य झाला आहे, फुलंब्री येथील रस्त्यावरील काँक्रिटचे काम पूर्ण करावे, रस्त्यांवर जी-२०च्या अनुषंगाने वाहतूक नियम सूचनाफलक रेडियमसह लावणे, ३० डिसेंबरपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण करावीत, आदी निर्देश आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी