शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सचिवांकडून पीक परिस्थितीचा आढावा

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत

औरंगाबाद : पिकांची सुधारित आणेवारी निश्चित करण्यासाठी विभागात आतापर्यंत महसूल विभागाकडून पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग झाले आहेत, अशी माहिती मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत आज प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. १५ नोव्हेंबरपूर्वी सुधारित आणेवारी जाहीर करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचना यावेळी मुख्य सचिवांनी दिल्या.राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह कृषी, जलसंपदा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी मराठवाड्यातील परिस्थितीविषयी माहिती सादर केली. सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक गावांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. प्रशासनाने औरंगाबाद, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांना २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. टंचाई परिस्थिती लक्षात घेता वेळेवर आणेवारी जाहीर करण्यासाठी पावले उचलावीत, त्यासाठी लवकरात लवकर पीक कापणीचे प्रयोग घ्यावेत, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. आतापर्यंत विभागात महसूल खात्यातर्फे पीक कापणीचे साडेपाच हजार प्रयोग घेण्यात आले असून, उर्वरित ठिकाणी प्रयोग घेण्याची कारवाई सुरू असल्याचे याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी सांगितले. खरिपाच्या सर्व पिकांच्या कापणीचे प्रयोग घेऊन १५ नोव्हेंबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर केली जाणार आहे, तर अंतिम आणेवारी डिसेंबर महिन्यात जाहीर केली जाईल. या बैठकीला मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत कृषी आणि पुनवर्सन विभागाचे सचिवही उपस्थित होते, तर विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, कृषी विभागाचे सहायक संचालक जनार्दन जाधव, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एन.व्ही. शिंदे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. आणेवारी काढण्यासाठी महसूल विभाग पीक कापणीचे प्रयोग घेत आहे. दुसरीकडे कृषी विभागानेही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी कापणीचे प्रयोग सुरू केले आहेत. मात्र, कृषी विभागाने आतापर्यंत विभागात मूग, उडीद आणि सोयाबीन या तीन पिकांचे केवळ ८७० प्रयोग घेतले आहेत, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.