शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

बसविलेले रोहित्र अभियंत्याने काढले

By admin | Updated: July 1, 2014 01:08 IST

लालखाँ पठाण , गंगापूर नव्याने मंजूर होऊन बसविण्यात आलेले रोहित्र अभियंत्याने काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरणविरुद्ध रोष निर्माण झाला

लालखाँ पठाण , गंगापूरनव्याने मंजूर होऊन बसविण्यात आलेले रोहित्र अभियंत्याने काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरणविरुद्ध रोष निर्माण झाला असून, काढून नेलेले रोहित्र तात्काळ बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गंगापूर तालुक्यातील आगरवाडगाव शिवारात हा प्रकार घडला. या परिसरासाठी सहा नवीन रोहित्रे बसविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती. यातील काही रोहित्र ठेकेदाराकरवी बसविण्यात आले. आगरवाडगाव शिवारात गट क्रमांक १९३ मध्येही एका रोहित्रासाठी काम सुरू करण्यात येऊन नवीन खांब व रोहित्र बसविण्याचा सांगाडा तयार करण्यात आला. हे काम पूर्णत्वास येऊन बनविलेल्या सांगाड्यावर नवीन रोहित्र बसविण्यात आले. रोहित्र बसताच संबंधित परिसराच्या अभियंत्यांनी ठेकेदाराला बसविलेले रोहित्र काढून टाकण्याचे फर्मान सोडले. ठेकेदारानेही बसवलेले रोहित्र काढून घेतले व कामाच्या ठिकाणाहून इतरत्र हलविले.याबाबत संबंधित अभियंता अंबोरे यांना विचारले असता ते म्हणाले, रोहित्र बसविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ठेकेदाराने पूर्तता केली नाही म्हणून त्यास रोहित्र काढून घेण्याचे सांगितले. आता प्रश्न असा पडतो की, हे काम एक दिवसाचे नाही. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित्रासाठी स्वतंत्र लाईन ओढण्याच्या कामासाठी खांब रोवण्यात आले, त्यावर तारा ओढल्या, रोहित्रासाठी सांगाडाही तयार झाला, तेव्हा अंबोरे कुठे गेले होते? त्यांना या कामाची माहिती नव्हती का? त्याचवेळी त्यांनी काम बंद का केले नाही? संबंधित विभागाच्या परवानगीशिवाय कुठलेच नवीन काम करता येत नाही, हा नियम सर्वश्रुत आहे. मग एवढे दिवस अंबोरे होते कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारभाराची चौकशी करावी व संबंधित अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी या भागातून होत आहे.‘हिस्सा’ न मिळाल्याने सूडभावनेतून कारवाईखाजगीत बोलताना एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एका रोहित्रासाठी शेतकऱ्यांना किमान ८० हजार रुपये खर्च येतो. नंतर हा पैसा संबंधित ठेकेदार व अभियंता आपापसात वाटून घेतात. कदाचित रकमेचा हिस्सा साहेबांना मिळाला नसेल म्हणूनच त्यांनी रोहित्र काढून घेण्याचे फर्मान सोडले असावे. एकीकडे शेतकरी वाचला तर जग वाचेल, असे म्हणत शासन योजना राबवीत असताना महावितरण कंपनीचे काही अधिकारी शेतकऱ्यांचा आर्थिक, मानसिक छळ करीत आहेत.