शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटण्याचा विक्रम'; 'गिनीज बूक'ने नोंद द्यावी, मनसेचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 17:44 IST

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. यातच जलवाहिनी फुटण्याचा घटना सातत्याने होत आहेत

छत्रपती संभाजीनगर: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी फुटण्याचे आणि शहराला निर्जळीचा सामना करावा लागतो. सतत घडणाऱ्या या घटनांची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गिनीज बूकच्या संस्थेला पत्र पाठविले आहे. या पत्राची एक प्रत मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना दिली. 

मनसेने जिल्हा उपाध्यक्ष संकेत शेटे यांनी याविषयी प्रसिद्धी पत्रात नमूद केले की, शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत असते. जलवाहिनी फुटल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. आजही पुन्हा जलवाहिनी फुटल्याचे कळाले. जलवाहिनी फुटण्याचे हे रेकॉर्ड मनपा प्रशासन उत्तरोत्तर करीत आहेत. मनपाच्या या जागतिक विक्रमाची नोंद घ्यावी असे आवाहन लंडन येथील गिनीज बुक रेकॉर्डच्या कार्यालयाला पत्र पाठवून केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे त्रस्त आहेत. निवडणुका झाल्या, शहराला मंत्री पदे मिळाली, पैठण येथील जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. असे असूनही शहरवासियांना ७ ते ९ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. 

दसरा, दिवाळी सारखे सणातही ही परिस्थिती कायम आहे. पाणी नाही मिळाले तरी शहराचे नाव या गिनीज बुक रेडॉर्डमध्ये नोंदवल्या जाईल, यामुळे महापालिकेचे नाव जगभरात पोहोचेल अशी खोचक खंत व्यक्त केली. हे निवेदन मनपा प्रशासक यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे संकेत शेटे, महानगर अध्यक्ष बिपीन नाईक, सचिव राहुल पाटील, वाहतुक शाखेचे जिल्हाध्यक्ष मनिष जोगदंडे उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMNSमनसे