शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फिर्यादी सापडत नसल्याने कोट्यवधींचा ऐवज वर्षानुवर्ष पोलीस ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:13 IST

: फिर्यादीच सापडत नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि अन्य वस्तू, असा मुद्देमाल विविध ठाण्यांच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आदेश : विशेष मोहीम राबवून तक्रारदारांचा शोध घेऊन १० लाखाचा ऐवज केला परत

औरंगाबाद : फिर्यादीच सापडत नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि अन्य वस्तू, असा मुद्देमाल विविध ठाण्यांच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे २६४ केसेसमध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालात चोरट्यांकडून जप्त केलेला किमती ऐवज तक्रारदारांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.शहरातील विविध भागांत चोऱ्या, घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांची नोंद होत असते. गुन्ह्याचा तपास करून चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त केल्यानंतर संशयित आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जातो. खटल्याचा निकाल जाहीर करताना आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालासंदर्भात न्यायालय आदेश देतात. अशा प्रकारे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांतील २६४ केसेसचा निकाल देताना न्यायालयाने चोरांकडून जप्त केलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने अथवा अन्य वस्तू फिर्यादींना परत करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे आदेश पोलिसांना प्राप्त होऊन अनेक वर्षे उलटली. मात्र, अनेक खटल्यांचे निकालच पोलिसांपर्यंत आलेले नाहीत. परिणामी, चोरांकडून जप्त केलेला ऐवज ठाणेदारांच्याच ताब्यात आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी न्यायालयात प्रलंबित गुन्हे, न्यायालयाने दिलेले निकाल आणि आदेश, याबाबतची माहिती घेतली. तेव्हा केसचा निकाल लागून अनेक वर्षे उलटली तरी संबंधित ठाणेदारांनी २६४ केसेसमधील तक्रारदारांना त्यांचा ऐवज परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे समजले. याविषयी त्यांनी संबंधित ठाणेदारांकडून माहिती घेतली असता तक्रारदार सापडतच नसल्याने मुद्देमाल तक्रारदाराला देता आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.चौकट५५ जणांना वस्तू सन्मानपूर्वक परतचोरीला गेलेला ऐवज तक्रारदाराला लगेच परत मिळाला, तर त्याचे समाधान होईल, ही बाब लक्षात घेऊन तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करा, असा आदेश आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला. त्यामुळे शहरातील सर्व ठाणेदारांनी विशेष मोहीम राबवून ५५ तक्रारदार शोधून काढले. त्यांना सुमारे १० लाख ९८ हजार ३४१ रुपये किमतीच्या वस्तू पोलीस आयुक्त प्रसाद यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक परत केल्या. यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्यासह सर्व ठाणेदारांची उपस्थिती होती.५५ तक्रारदारांना अकरा लाखांचा माल केला परतआयुक्तालयात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात विविध ठाण्यांतील ५५ तक्रारदारांना १० लाख ९८ हजार ३४१ रुपयांचा माल पोलीस आयुक्तांच्या हस्ते परत केला. यात ५५४ ग्र्रॅम सोन्याचे दागिने, २५ मोटारसायकल आणि रिक्षा, ९ मोबाईल हॅण्डसेट, १ टॅब, १ लॅपटॉप आणि रोख ५६ हजार ४४५ रुपयांचा समावेश आहे....२३ वर्षांनंतर मिळाला चोरीचा ऐवजचोरट्यांनी १९९५ मध्ये सिडकोतील विष्णू कृष्णराव देशमुख यांचे घर फोडले होते. या घटनेत चोरट्यांनी चोरून नेलेली चांदीची समई, चांदीची ताटली, चांदीचे धूपपात्र (दोन), चांदीच्या तीन वाट्या, चांदीचे तीन चमचे, चांदीची गणपती मूर्ती, चांदीची महादेव पिंड आणि चांदीची मंगळागौर, अशा सुमारे ११ किलो ५०० ग्रॅम वजनाच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी संशयिताला सिडको पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात खटला भरला होता. या खटल्याचा निकाल २०१४ साली लागला. आजच्या कार्यक्रमात त्यांना त्यांच्या वस्तू तब्बल २३ वर्षांनंतर परत मिळाल्या.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी