शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

फिर्यादी सापडत नसल्याने कोट्यवधींचा ऐवज वर्षानुवर्ष पोलीस ठाण्यात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:13 IST

: फिर्यादीच सापडत नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि अन्य वस्तू, असा मुद्देमाल विविध ठाण्यांच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आदेश : विशेष मोहीम राबवून तक्रारदारांचा शोध घेऊन १० लाखाचा ऐवज केला परत

औरंगाबाद : फिर्यादीच सापडत नसल्याने कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने आणि अन्य वस्तू, असा मुद्देमाल विविध ठाण्यांच्या तिजोरीत अनेक वर्षांपासून पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे २६४ केसेसमध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालात चोरट्यांकडून जप्त केलेला किमती ऐवज तक्रारदारांना परत करण्याचे आदेश दिले आहेत.शहरातील विविध भागांत चोऱ्या, घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांची नोंद होत असते. गुन्ह्याचा तपास करून चोरट्यांकडून मुद्देमाल जप्त केल्यानंतर संशयित आरोपींविरोधात न्यायालयात खटला दाखल केला जातो. खटल्याचा निकाल जाहीर करताना आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालासंदर्भात न्यायालय आदेश देतात. अशा प्रकारे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध ठाण्यांतील २६४ केसेसचा निकाल देताना न्यायालयाने चोरांकडून जप्त केलेले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहने अथवा अन्य वस्तू फिर्यादींना परत करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे आदेश पोलिसांना प्राप्त होऊन अनेक वर्षे उलटली. मात्र, अनेक खटल्यांचे निकालच पोलिसांपर्यंत आलेले नाहीत. परिणामी, चोरांकडून जप्त केलेला ऐवज ठाणेदारांच्याच ताब्यात आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी न्यायालयात प्रलंबित गुन्हे, न्यायालयाने दिलेले निकाल आणि आदेश, याबाबतची माहिती घेतली. तेव्हा केसचा निकाल लागून अनेक वर्षे उलटली तरी संबंधित ठाणेदारांनी २६४ केसेसमधील तक्रारदारांना त्यांचा ऐवज परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे समजले. याविषयी त्यांनी संबंधित ठाणेदारांकडून माहिती घेतली असता तक्रारदार सापडतच नसल्याने मुद्देमाल तक्रारदाराला देता आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.चौकट५५ जणांना वस्तू सन्मानपूर्वक परतचोरीला गेलेला ऐवज तक्रारदाराला लगेच परत मिळाला, तर त्याचे समाधान होईल, ही बाब लक्षात घेऊन तक्रारदारांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करा, असा आदेश आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिला. त्यामुळे शहरातील सर्व ठाणेदारांनी विशेष मोहीम राबवून ५५ तक्रारदार शोधून काढले. त्यांना सुमारे १० लाख ९८ हजार ३४१ रुपये किमतीच्या वस्तू पोलीस आयुक्त प्रसाद यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक परत केल्या. यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्यासह सर्व ठाणेदारांची उपस्थिती होती.५५ तक्रारदारांना अकरा लाखांचा माल केला परतआयुक्तालयात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात विविध ठाण्यांतील ५५ तक्रारदारांना १० लाख ९८ हजार ३४१ रुपयांचा माल पोलीस आयुक्तांच्या हस्ते परत केला. यात ५५४ ग्र्रॅम सोन्याचे दागिने, २५ मोटारसायकल आणि रिक्षा, ९ मोबाईल हॅण्डसेट, १ टॅब, १ लॅपटॉप आणि रोख ५६ हजार ४४५ रुपयांचा समावेश आहे....२३ वर्षांनंतर मिळाला चोरीचा ऐवजचोरट्यांनी १९९५ मध्ये सिडकोतील विष्णू कृष्णराव देशमुख यांचे घर फोडले होते. या घटनेत चोरट्यांनी चोरून नेलेली चांदीची समई, चांदीची ताटली, चांदीचे धूपपात्र (दोन), चांदीच्या तीन वाट्या, चांदीचे तीन चमचे, चांदीची गणपती मूर्ती, चांदीची महादेव पिंड आणि चांदीची मंगळागौर, अशा सुमारे ११ किलो ५०० ग्रॅम वजनाच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी संशयिताला सिडको पोलिसांनी अटक करून त्याच्याविरोधात न्यायालयात खटला भरला होता. या खटल्याचा निकाल २०१४ साली लागला. आजच्या कार्यक्रमात त्यांना त्यांच्या वस्तू तब्बल २३ वर्षांनंतर परत मिळाल्या.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी