शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची बोलती बंद !

By admin | Updated: October 14, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा चोवीस तासांचा अवधी राहिला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी

  उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघा चोवीस तासांचा अवधी राहिला असून, गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत. बुधवारी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुढील चोवीस तासांत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून ‘गुपचूप’ प्रचारयंत्रणा राबविली जाणार आहे. दरम्यान, या कालावधीत कुठेही पैसे वाटपासारखे गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी आचारसंहिता पथक करडी नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकीचे वातावरण तापत होते. विद्यमान आमदारांसोबतच तिकिटाची खात्री असलेल्या काही उमेदवारांनीही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदारांशी संपर्क वाढवून निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. १२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी केल्यानंतर प्रचारयंत्रणेला अधिक गती आली. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पदयात्रा, रॅली व मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची राळ उडवून दिली होती. या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तुळजापूरला केंद्रबिंदू मानून जिल्ह्यातील प्रचारयंत्रणा राबविली. श्री क्षेत्र तुळजापुरात भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर शिवसेनेच्या वतीने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जंगी सभा झाल्या. तसेच परंडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजीत पवार, भाजपाच्या वतीने रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर, तसेच पंकजा मुंडे तर कळंब येथे कळंब राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे व शिवसेनेकडून अमोल कोल्हे या स्टार प्रचारकांच्या सभा झाल्या. याशिवाय त्या-त्या पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सभा, पदयात्रांनी चारही मतदारसंघ ढवळून निघाले. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर महायुती आणि आघाडीमधील जागा वाटपावरून सुरू झालेला घोळ बरेच दिवस चालला. त्यामुळे आघाडी, युती राहते की तुटते, याबाबत सुरूवातीचे काही दिवस चांगलीच चर्चा रंगली होती. शिवाय इच्छूक उमेदवारांतही संभ्रमावस्था होती. अशा परिस्थितीतच जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात विविध पक्ष तसेच अपक्ष अशा शंभराहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेर आघाडी आणि युतीतील सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही वाढली. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर चार विधानसभा मतदारसंघात एकूण ५६ उमेदवार रिंगणात राहिले. यात उमरगा आणि तुळजापूर या दोन मतदारसंघात प्रत्येकी १३, परंडा मतदार संघात दहा तर उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात मात्र मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्य पक्षाचे सहा, नोंदणीकृत पक्षाचे सहा आणि अपक्ष आठ अशा वीस उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यात चार विधानभा मतदार संघात १२ लाख ३४ हजार ४९० मतदार आहेत. मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात १४ हजार १९ मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. एकूण मतदारांमध्ये ६ लाख ६२ हजार ८५३ पुरुष तर ५ लाख ६९ हजार ६२३ महिला व १४ इतर मतदारांचा समावेश आहे. तुळजापूर मतदारसंघामध्ये १ लाख ७८ हजार ५२३ पुरूष व १ लाख ५१ हजार ६३५ महिला आणि सात इतर मतदार आहेत. उमरगा विधानसभा मतदार संघामध्ये १ लाख ५० हजार ९१३ पुरूष १ लाख ३० हजार ७६३ महिला आणि चार इतर मतदारांचा समावेश आहे. उस्मानाबादमध्ये १ लाख ७४ हजार ९८१ पुरुष, १ लाख ५१ हजार ४०४ महिला व दोन इतर तर परंडा मतदारसंघामध्ये पुरूष मतदारांची संख्या १ लाख ५८ हजार ४३६ तर १ लाख ३५ हजार ८२१ महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या एक इतकी आहे.