शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

पारध परिसरात मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: July 3, 2014 00:21 IST

पारध: भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केलेली आहे.

पारध: भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केलेली आहे. विहिरींना पाणी असल्याने ठिबक सिंचनाचा आधार घेत ६० टक्के शेतकऱ्यांनी हे पीक घेतले. मात्र आता रोपांना कोकडा रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.परिसरातील पिंपळगाव रेणुकाई, लिहा, शेलूद, पारध खुर्द, पद्मावती, वालसावंगी येथील शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून ठिबक संच खरेदी केले. मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली. मात्र सुरूवातीपासूनच या रोपांवर कोकडा रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी औषधींची फवारणी करून ही रोपे जगविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उपयोग झालेला नाही. ६० ते ७० टक्के रोपे या रोगामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांना ते उपटून टाकावे लागले. उर्वरीत रोपे जगविण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतानाच भारनियमनात वाढ झाली. त्यातच मागील १५ दिवसांपासून हवेचा जोेर जास्त असल्याने विहिरींच्या पाणीपातळीही मोठी घट होत आहे.काही विहिरी तसेच कूपनलिका कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या आशेवर जगविलेल्या मिरचीला पाणी द्यायचे कसे हे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे.पावसाची प्रतीक्षाजून महिना संपला तरी परिसरात अद्यापपर्यंत पाऊस पडला नाही. ठिबकवर आता पर्यंत मिरची व धूळ पेरणीतील कपाशी कशीबशी जगविली. मात्र विहिरीतील पाणी पातळीत होणारी घट आणि वाढते भारनियन यामुळे पिके धोक्यात आली आहेत. तर अद्याप खरिपाची पेरणीच न झाल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)