शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांच्याच घशाला कोरड

By admin | Updated: May 31, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्या जिल्ह्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली होती.

उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्या जिल्ह्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच भूम, वाशी, कळंब या तालुक्यातील बहुतांश लहान मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. आजघडीला प्रकल्पातील पाणी पातळी चिंताजनक आहे. मध्यम व लघु असे ६९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. परिणामी टंचाईचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. भूम, वाशी, परंडा आणि कळंब या तालुक्यामध्ये गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळेच या तीन-चार तालुक्यातील जवळपास ८४ गावांना अधिग्रहण व टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक टँकरची संख्या वाढू लागली आहे. कारण या परिसरातील जलस्त्रोतही तितक्याच झपाट्याने कोरडेठाक पडत आहेत. धरणांची पाणीपातळीही त्याच गतीने कमी होऊ लागली आहे. जिल्हाभरात लहान-मोठे व मध्यम प्रकल्पांची संख्या २११ इतकी आहे. यामध्ये १७ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची साठवण क्षमता २०२.८५९ दलघमि इतकी आहे. प्रत्यक्षात आजघडीला १८.५७७ दलघमि इतका अत्यल्प साठा आहे. लघु प्रकल्पाच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. १९३ प्रकल्पात प्रत्यक्ष २६.०१९ इतकाच साठा उपलब्ध आहे. दरम्यान, २११ पैकी ६९ प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक राहिलेला नाही. यामध्ये ६५ लघु तर ४ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच ६२ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. तर ४ लघु मध्यम प्रकल्पामध्ये ५० टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. प्रकल्पाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने त्या-त्या भागातील विहिरी, हातपंप हेही तेवढ्याच गतीने बंद पडू लागले आहेत. त्यामुळे जलसंकट दिवसागणिक तीव्र होऊ लागले आहे. भूम तालुक्यामध्ये सध्या २४ गावे आणि ९ वाड्यांना २७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही या तालुक्यातील ग्रामस्थांनी टंचाईच्या तीव्र झळा सोसल्या आहेत. यावर्षीही त्यापेक्षा काही वेगळी स्थिती नाही. डिसेंबर महिन्यापासून वालवड सर्कलमधील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंब तालुक्यातही टँकरची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या १४ गावांची तहान ६४ अधिग्रहण आणि १८ टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे. परंडा तालुक्यातील टँकरचा आकडा दोनवरुन पाचवर जाऊन ठेपला आहे. तसेच दोन जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या माध्यमातून पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाशी तालुक्यात ९ टँकर सुरु आहेत. तसेच ८ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या माध्यमातून १२ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. भविष्यात वेळेवर पाऊस न पडल्यास हे जलसंकट अधिक गडद होऊ शकते. (प्रतिनिधी)