शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शहरात शांतता आणि गुन्हे नियंत्रणाला प्राधान्य : निखिल गुप्ता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 5:44 PM

शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी मावळते आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून पदभार स्वीकारला.

ठळक मुद्देशहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले असल्याने पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा येथे रुजू होत असल्यामुळे घरी आल्यासारखे वाटत आहेआपल्या कार्यालयाची दारे जनतेसाठी कायम उघडी असतील

औरंगाबाद :  शहरात शांतता ठेवणे, गुन्हे नियंत्रण आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी  कल्याणकारी योजना राबविण्यास आपले प्राधान्य असल्याचे नूतन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शुक्रवारी सांगितले.

शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी मावळते आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले असल्याने पोलीस आयुक्त म्हणून पुन्हा येथे रुजू होत असल्यामुळे घरी आल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्रसारमाध्यम आणि जनतेला सोबत घेऊन काम करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  पोलीस आयुक्त प्रसाद यांचे काम पुढे न्यायचे असल्याचे ते म्हणाले. 

जनतेने चांगल्या सूचना मोकळेपणाने कराव्यातशहरात शांतता राखून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, दाखल झालेल्या गुन्ह्याचा तात्काळ निपटारा करणे आणि शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यास प्राधान्य आहे.  आपल्या कार्यालयाची दारे जनतेसाठी कायम उघडी असतील, असे स्पष्ट करीत जनतेने त्यांच्या कामासाठी चांगल्या सूचना मोकळेपणाने कराव्यात, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. 

पाच वर्षांत औरंगाबाद औद्योगिक हब होईल -चिरंजीव प्रसाद औरंगाबाद शहरातील जनता खूप चांगली आहे. यामुळे पाच वर्षांत औरंगाबाद औद्योगिक हब  म्हणून ओळखले जाईल, अशी प्रतिक्रिया मावळते पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. येथील पोलीस उपायुक्त खाटमोडे यांनी पाहिजे असलेली आणि फरारी आरोपी शोधण्यासाठी उत्तम योजना विकसित केली.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबादPoliceपोलिस