शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"जलयुक्त शिवारमुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटला होता पण..."; PM मोदींची महाविकास आघाडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:32 IST

Chhatrapati Sambhajinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या १४ उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली.

Maharashtra Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजनरगमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रलंबित असलेल्या पाण्याच्या प्रश्नावरुन भाष्य केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याच्या योजनेसाठी केंद्राकडून ७०० कोटींची मदत करण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. महाविकास आघाडीवाल्यांना इथे घुसू देऊ नका, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

महायुतीच्या १४ उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाष्य केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार योजनेचेही कौतुक केले आहे. जलयुक्त शिवार योजनेवर महाविकास आघाडीच्या सरकारने बंदी आणल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

"देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली होती. या योजनेमुळे मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न मिटायला सुरुवात झाली होती. पण मध्येच अडीच वर्षांसाठी महाविकास आघाडीचे सरकार आलं होतं यांनी या योजनेला बंद करून टाकलं होतं पण जेव्हा महायुतीचे सरकार आलं तेव्हा हे काम पुन्हा सुरू करण्यात आलं. छत्रपती संभाजी नगरमध्ये  पाण्याच्या पुरवठ्यासाठी महायुती सरकारने १६०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची योजना आखली होती. पण त्याही योजनेवर  महाविकास आघाडीच्या लोकांनी स्थगिती आणली. आता ही योजना जेव्हा पुन्हा सुरू केली गेली आहे तेव्हा त्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याच्यासाठी केंद्र सरकार ७०० कोटी रुपये देत आहे हा फरक आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

"महाराष्ट्रात पाणी आणि दुष्काळाची समस्या सोडवणारं सरकार हवं की या योजनांना स्थगिती देणारे सरकार हवं. महाविकास आघाडीवाले पाण्याच्या थेंबासाठी तुम्हाला त्रास देतील. त्यामुळे महाविकास आघाडीवाल्यांना इथे घुसू देऊ नका. भाजपा महायुती आहे तर गती आहे आणि महाराष्ट्राची प्रगती आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस