शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भूस्खलन रोखण्यासाठी करा वृक्षसंवर्धन

By admin | Updated: August 2, 2014 01:10 IST

अविनाश चमकुरे, नांदेड भूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़

अविनाश चमकुरे, नांदेडभूस्खलनाने पुणे जिल्ह्यातील माळीण येथे अपरिमीत जीवित हानी झाली़ हे संकट नैसर्गिक असले तरी यास मानवी हस्तक्षेपही तितकाच जबाबदार आहे़ अशा स्वरुपाच्या घटना टाळण्यासाठी डोंगरावर वृक्षसंवर्धन करणे चांगला उपाय होवू शकतो, असे मत भूगर्भशास्त्राचे अभ्यासक तथा स्वारातीम विद्यापीठाचे बीसीयुडी डॉ़ दीपक पानसकर यांनी व्यक्त केले़ भूस्खलन झाल्याने माळीण हे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ येथील डोंगर बेसाल्ट या खडकापासून निर्माण झाले आहेत़ मराठवाड्यात आढळून येणारे खडक याच प्रकारातील आहेत़ सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची जास्त असून पाऊसही अधिक पडतो़ त्यामुळे असे प्रकार जास्त प्रमाणात घडतात़ तुलनेने मराठवाड्यात या उंचीचे डोंगरही नाहीत़ शिवाय पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने येथे भूस्खलनाची भीती नाही़ पर्यावरण संतुलनात वृक्षांची भूमिका महत्त्वाचीझाडाची मुळे जमीन घट्ट रोवून ठेवण्याचे काम करतात़ त्यामुळे जमिनीला भेगा पडणे, भूस्खलन होणे असे प्रकार होत नव्हते़ शहरीकरणासाठी जागेची कमतरता भासत असल्याने निसर्गाच्या विरोधात जावून अनेक डोंगर पोखरुन काढले जात आहे़ मुरुमासाठीही मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे़ यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला जात आहे़ बेसुमार वृक्षतोडीने मौल्यवान वनसंपदा नामशेष होत आहे़ परिणामी पावसाच्या अनियमिततेने अवर्षणाचा सामना करावा लागत आहे़ काय कराव्यात उपाययोजना ४डोंगरपायथ्याशी अनेक गावे वसली आहेत़ अशा डोंगरांची सातत्याने पाहणी करणे गरजेचे आहे़ विशेषत: पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही खबरदारी घ्यावी़ डोंगरावर भेगा आढळल्यास व ही फट वाढत गेल्यास येथे पावसाचे पाणी मुरण्याची जास्त शक्यता असते़ पुढील धोका टळण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे़ सिमेंटींग, वायरनेट, ग्राऊटींग करुन डोंगर एकसंघ ठेवता येऊ शकतो़ पुणे जिल्ह्यातील माळीण येथे भूस्खलनाच्या घटनेत अख्खे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेले़ त्यामुळे डोंगरपायथ्याशी असलेल्या राज्यभरातील गावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यासाठी आता राज्य शासनानेही उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे़, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे़