शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पूल बनलेत ‘मौत का कुआँ’; कठडे गायब, भिंती खचल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:14 IST

लातूर : सावित्रीनदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील जुना पूल ढासळून वाहून गेला़ त्यात ३५ जणांचा मृत्यू झाला़ ही घटना कालची आहे़

लातूर : सावित्रीनदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील जुना पूल ढासळून वाहून गेला़ त्यात ३५ जणांचा मृत्यू झाला़ ही घटना कालची आहे़ पण लातूर जिल्ह्यात पुलावरून वाहन कोसळून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ दोन महिन्यांपूर्वी महापूरच्या पुलाचा कठडा नादुरूस्त असल्याने जीप नदीपात्रात कोसळून चौघा जणांचा मृत्यू झाला़ याच पुलाचा कठडा नादुरूस्त असल्यामुळे एक ट्रॅव्हल्स पडून १२ जणांचा बळी गेला होता़ तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने बोध घेतला नाही़ लातूर जिल्ह्यात असे अनेक पूल नादुरूस्त अवस्थेत आहेत़ त्याचा स्पॉट पंचनामा ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी गुरूवारी केला़ हे पूल नव्हेत ‘मौत का कुआँ’ आहेत, अशी स्थिती आहे़ कुठे कठडे तर कुठे पुलाच्या भिंती कोसळल्या आहेत़ जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ लातूर जिल्ह्यातील प्रवाशांवर आहे़ तरीही बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे़ लातूर जिल्ह्याला जोडणारे एकूण १६ रस्ते आहेत़ लातूर-औसा, लातूर-बार्शी, लातूर-उदगीर, लातूर-अंबाजोगाई, लातूर-नांदेड, लातूर-कळंब तसेच अंतर्गत सारसा-वांजरखेडा, नायगाव-माटेफळ लातूर- कव्हा-जमालपूर, महापूर- बोरी, लातूर-पानगाव, रेणापूर-उदगीर - देगलूर आदी रस्त्यांवर छोटे- मोठे २६१ पूल आहेत़ मांजरा नदीवर लातूर-अंबाजोगाई आणि लातूर - नांदेड मार्गावर महापूर व भातखेडा गावानजिक मोठे पूल आहेत़ या रस्त्यांवर वर्दळ असते़ विशेष करून महापूरचा पूल अपघात प्रणव म्हणूनच ओळखला जातो़ वारंवार या पुलाची दुरूस्ती होणे गरजेचे आहे़ मात्र त्याकडे दुर्लक्ष होते़ अपघात झाल्यानंतरच डागडुजी केली जाते़ त्यानंतर दुर्लक्ष़ परिणामी, या पुलाच्या नादुरूस्तीमुळे अनेक अपघात घडून माणसे दगावली आहेत़ तरीही बांधकाम विभागाकडे पुलांच्या स्थितीबाबत अपडेट माहिती नाही़ कोणता पूल नादुरूस्त झाला आहे़ त्याचा कालावधी काय, याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवली नाही़ ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी १५ पुलांवर गुरूवारी ठाण मांडले़ उदगीर, देवणी, जळकोट, निलंगा, अहमदपूर, रेणापूर, लातूर, चाकूर, शिरूरअनंतपाळ, औसा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या बहुतांश पुलांची अवस्था दयनीय आहे़ अहमदपूर-उदगीर या राज्यमार्गावरील हाळीजवळील निजामकालीन तिरू नदीवरील पूल जीर्ण झाला आहे़ पुलाच्या भिंतीतून मोठ-मोठी झाडे उगविली आहेत़ तर मांजरा नदीवरील गिरकनाळ पुलाला तडे गेले आहेत़ यंत्रणेचे दुर्लक्ष आहे़ (सविस्तर वृत्त हॅलो ४ वर)