शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण !

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

कळंब : कळंब-उस्मानाबाद मतदार संघात आता पक्षांतर्गत काटाकाटीचे राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्युव्हरचना आखली जात आहे.

कळंब : कळंब-उस्मानाबाद मतदार संघात आता पक्षांतर्गत काटाकाटीचे राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्युव्हरचना आखली जात आहे. या काटाकाटीमध्ये कोणाकोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला खुर्ची मिळणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.कळंब - उस्मानाबाद मतदारसंघात चौरंगी फाईट होत आहे. प्रत्येक पक्षाने ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली आहे. ‘अभी नही, तो कभी नही’ असा नाराचं पक्षश्रेष्ठींनी दिल्याने पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमाने तयारीला लागल्याचे चित्र आहे. परंतु, या धामधुमीत प्रत्येक पक्षातील नाराज गट अजूनही शांत आहे. या गटाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षांनी फिल्डींग लावली आहे.मतदारसंघात शिवसेनेतील गटबाजीने कहर केला आहे. हा नाराज गट अजूनही प्रचाराच्या रिंगणात उतरला नाही. तेरणा साखर कारखाना, तसेच सेना आमदारांच्या आजपर्यंच्या कार्याचा हिशोब मतदारांनी मागितला तर काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न या नाराज गटाकडून विचारला जात आहे. त्यातच काँग्रेसची जिल्हा परिषदेत सेना-भाजपासोबत युती आहे. मग काँग्रेसवर टिका कोणत्या तोंडाने करायची? असा प्रश्नही शिवसैनिकांतून विचारला जातो आहे. या नाराज शिवसैनिकांना कोठे उघड तर कोठे अंतर्गत कामाला लावण्याची फिल्डींग राष्ट्रवादी व भाजपकडून आखली जात आहे. अशा नाराज गटांबरोबर चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत तालुक्यातील काँग्रेसला स्थान न मिळाल्याने पक्षातील एक गट नाराज आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या अर्चना शेळके यांना महिला व बालविकास सभापतीपद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी होती. परंतु, सेनेने त्यांच्या सोईचे राजकारण केल्याने व काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही यात गांभिर्याने लक्ष न घातल्याने काँग्रेसचा एक गट सेना व काँग्रेसवरही नाराज आहे. त्यातच निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये स्थान न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. हा नाराज गटही भाजपा व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.‘आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते असताना पक्षाने आमच्या कार्याची दखल घेतली नाही व उमेदवारीसाठी डावलले’ असे म्हणत तालुक्यातील भाजपाचा एक गट नाराज आहे. या नाराज गटातील दोन-चार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी मदतीचा ‘हात’ देण्याची बोलणी केल्याची चर्चा आहे. या कार्यकर्त्यांमुळे भाजपाला काही फटका बसणार नाही. परंतु ‘त्या’ नेत्यांचा राष्ट्रवादीला काय फायदा होणार? असा प्रतिसवाल भाजपा कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. भाजपाचे मतदान ‘फिक्स’ आहे. त्यामुळे कोणी कोठेही गेले तरी फरक पडणार नसल्याची भूमिका भाजपा गोटातून घेतली जात आहे.