शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची तक्रार सेवा ‘आॅफलाईन’!

By admin | Updated: April 19, 2015 00:49 IST

बीड : येथील पालिकेने मोठा गाजावाजा करीत नागरिकांच्या तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली

बीड : येथील पालिकेने मोठा गाजावाजा करीत नागरिकांच्या तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली. मात्र, ही सुविधा आॅफलाईन असल्यामुळे ना तक्रारी करता येताहेत ना त्याचे निराकरण होतेय. त्यामुळे पालिकेची आॅनलाईन तक्रार सेवा फुसका बार ठरली आहे.ई गर्व्हनन्स अंतर्गत बीड पालिकेने १९ जुलै २०१२ रोजी आॅनलाईन तक्रार सेवा सुरू केली. तेव्हापासून ते आतापर्यंत या तक्रार विभागाला ग्रहनच लागलेले आहे. तक्रार घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी जागेवर नसतात. नगर रचना विभागातील तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सोय मराठवाड्यात पहिल्यांदा बीडमध्ये उपलब्ध झाली होती. जन्म मृत्यू नोंद २०१२, आवकजावक २०१३, विवाह नोंदणी, मालमत्ता २०१४ व लेखा संबंधित तक्रारींची आॅनलाईन सुविधा २०१५ मध्ये सुरू करण्यात आली आहे.निवारण सेवाच समस्येच्या गर्तेतही सुविधा सुरू झाल्यामुळे नागरीकांच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा होती, मात्र पालिकेची उदासीनता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे ही सुविधा पुर्णत: ‘फ्लॉप’ ठरली आहे. त्यामुळे तक्रारींचा पाढा आजही कायमच असल्याचे दिसून येत आहे. एसएमएस सुविधा सुरूआपल्या तक्रारींची आणि कर भरणा केलेली पावती, कर थकबाकी याची माहिती मोबाईलवर घरबसल्या मिळत आहे. ही सुविधा ४ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असल्याचे लिपीक राम शिंदे यांनी सांगितले.नागरिकांची सीओंकडे धावतक्रारी घेण्यासाठी कोणीच नसल्याने संतप्त नागरीकांनी तक्रार विभागाचीच तक्रार मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली होती. यावर मुख्याधिकारी भालसिंग यांनी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून चांगलेच धारेवर धरले. (प्रतिनिधी)तक्रार घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी गैरहजर असूनही त्यांना केवळ नोटीस दिली जाते.४मात्र त्यांच्यावर कसलीच कारवाई केली जात नाही. ४वरिष्ठच पाठिशी घालत असल्याचा आरोप होत आहे.पहिल्यांदा तक्रार विभागात तक्रार द्यावी. नंतर ही तक्रार तीन दिवसात संबंधीत विभागाला जाणे आवश्यक आहे. त्यानंतर ३० दिवसात संबंधीत विभागाने ती दुर करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तिचा अहवाल पाठवावा. त्यांनी याची चौकशी करून तीन महिन्याच्या आत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक असून यावर काय कारवाई करायची हा निर्णय मुख्याधिकाऱ्यांचा असल्याचे प्राशासकीय अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.