शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’ने घातला मनपाला गंडा

By admin | Updated: July 30, 2016 01:01 IST

औरंगाबाद : औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या फसवणुकीचे प्रकार आता उघडकीस येत असून, मनपा हद्दीच्या बाहेर नागरिकांकडून अभय योजनेंतर्गत लाखो रुपये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका घेतलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीच्या फसवणुकीचे प्रकार आता उघडकीस येत असून, मनपा हद्दीच्या बाहेर नागरिकांकडून अभय योजनेंतर्गत लाखो रुपये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महापालिकेने कंपनीविरुद्ध फसवणूक, पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी महापालिका हद्दीतील संपूर्ण पाणीपुरवठ्याचा भार औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविला. कंपनीला फक्त मनपा हद्दीत काम करण्याचे अधिकार मनपाने दिले. कंपनीने मनपाच्या हद्दीत नसलेल्या अब्रार कॉलनी, शहानगर, बीड बायपास भागातील अनेक वसाहतींमध्ये अनधिकृत नळ अधिकृत करून देण्याची योजना आखली. सातारा परिसरात या वसाहतींचा समावेश असतानाही कंपनीने नागरिकांकडून लाखो रुपये जमा केले. अलीकडेच सातारा परिसराचा मनपा हद्दीत समावेश करण्यात आला आहे. कंपनीने मनपा हद्दीबाहेर जाऊन काम केले. ज्या नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते, त्यांना कस्टमर क्रमांकही दिला नाही. नागरिकांकडून जमा केलेले पैसे मनपाच्या तिजोरीतही जमा केले नाही. ज्या नागरिकांनी कंपनीला नळ अधिकृत करण्यासाठी पैसे दिले होते, ते नागरिक मनपा कार्यालयांमध्ये यावर्षीचे पैसे भरण्यासाठी येत आहेत. मनपाकडे त्यांचे नळ अधिकृत केल्याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. मनपाने चौकशी केली असता कंपनीचे पितळ उघडे पडले. उपअभियंत्याच्या तक्रारीवरून साताऱ्यात गुन्हा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आय. बी. खाजा यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत कंपनीने १ सप्टेंबर २०१४ ते २८ जुलै २०१६ पर्यंत अनेक नागरिकांकडून अभय योजनेत पैसे जमा केले. कंपनीचे संचालक ऋषभ सुशील सेठी यांनी रक्कम मनपाकडे जमा केलीच नाही. कंपनीने महापालिकेची फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी फसवणूक आणि पैशांचा अपहार केल्याबद्दल सेठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.