शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीआॅनलाईन प्रश्नपेढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 19:46 IST

औरंगाबाद : देशपातळीवर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. यात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, त्याची तयारी चांगली व्हावी, या उद्देशाने विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात बदल केला आहे. बदल केलेली प्रश्नपेढी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आॅनलाईन उपलब्ध करून दिली आहे.

औरंगाबाद : देशपातळीवर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. यात महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, त्याची तयारी चांगली व्हावी, या उद्देशाने विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात बदल केला आहे. बदल केलेली प्रश्नपेढी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आॅनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या परीक्षेवेळी या प्रश्नपेढीचा उपयोग बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मंडळाने कळविले आहे.


विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ११ वीच्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात आला होता. तर १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात बदल केला जाणार आहे. त्यासाठी राज्य मडळामार्फत व विभागीय मंडळांमार्फत ११ वी व १२ वीच्या मूल्यमापन योजनेत झालेला बदल अवगत करून देण्यासाठी विषयांप्रमाणे मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व विषय शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. यासंदर्भातील ११ वी आणि १२ वीच्या उपरोक्त विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका व नमुना उत्तरपत्रिका सुद्धा मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

१२ वी च्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या सरावासाठी उद्दिष्टानुसार व प्रश्नप्रकारांनुसार गुणविभागणी आणि पाठांनुसार गुणविभागणही मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. राज्यातील विविध भागातील शिक्षकांनी अभ्यासपूर्ण व वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार कलेले असून, या प्रश्नांचे तज्ज्ञांमार्फत परीक्षण केल्यनंतर ते या प्रश्नपेढीत उपलब्ध करून दिले आहे. प्रश्नपेढी अधिक समृद्ध व निर्दोष होण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्यास त्याचाही मंडळातर्फे विचार केला जाणार असल्याचे मंडळातर्फे कळविले आहे.


हा होईल प्रश्नपेढीचा उपयोग
यावर्षी १२ वी येणाºया प्रश्नांच्या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांना पूर्ण कल्पना येईल, प्रश्नपत्रिका आराखड्याबाबतची भिती व गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनातून जाईल, प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना भरपूर सराव होईल, शिक्षकांना नवनवीन प्रश्न तयार करण्याची कल्पना येईल आणि विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद