शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

मनपात एक हजार संचिका तुंबल्या

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महापालिकेत जलवाहिन्या, ड्रेनेज, पथदिवे, अंतर्गत रस्ते, हायमास्ट टाकण्यासंबंधीच्या सुमारे १ हजार संचिका तुंबल्या आहेत


औरंगाबाद : महापालिकेत जलवाहिन्या, ड्रेनेज, पथदिवे, अंतर्गत रस्ते, हायमास्ट टाकण्यासंबंधीच्या सुमारे १ हजार संचिका तुंबल्या आहेत. त्या कामांना सुमारे ५० कोटी रुपये लागणार असून, ही रक्कम आगामी काळात मनपाला उत्पन्नरूपातून मिळणे अशक्य आहे. या कामांच्या संचिकांचा निपटारा झाला तरी ती कामे सुरू होणे अवघड असणार आहे.
मनपा निवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता मार्च २०१५ च्या पहिल्या आठवड्यात लागेल. तत्पूर्वी, जास्तीत जास्त संचिका मंजूर करून विकासकामे करण्यासाठी नगरसेवक धावपळ करीत आहेत. मात्र, मनपाची आर्थिक परिस्थिती सध्या डबघाईला आलेली आहे.
नवीन कामे न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, नगरसेवकांच्या प्रलंबित असलेल्या सर्व संचिका शहर अभियंत्यांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुंबलेल्या संचिकांपैकी किती संचिकांना मंजुरी द्यायची याचा समन्वयाने विचार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्याची संचिकांवर काहीही निर्णय घेतला जात नाही. अंतर्गत रस्ते आणि पथदिव्यांच्या संचिकादेखील मंजुरी मिळण्याच प्रतीक्षेत आहेत; परंतु आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखाधिकारी यांच्यातील असमन्वयामुळे संचिकांना मुहूर्त लागत नाही. याचा उद्रेक म्हणून नगरसेवकांनी उपोषणाचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे.
शहरात ९९ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डातील किमान १० संचिका तरी निर्णयाअभावी ठप्प आहेत. ५० लाख रुपयांच्या आसपास एकेका वॉर्डात कामे आहेत. २०१५ साली ज्यांना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. त्यांची वॉर्डात कामे करण्यासाठी धावपळ सुरू आहे. विद्युत, ड्रेनेज, बांधकाम विभागांच्या अभियंत्यांच्या दालनात नगरसेवक हेलपाटे घालीत आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे अभियंते नगरसेवकांना भाव देत नसल्याचे दिसते.
४मनपाला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ४०० कोटींच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. सध्या २०० कोटींची उत्पन्न मिळाले आहे. यंदाचे बजेट ८०० कोटींचे आहे. २०१५ मध्ये मनपाच्या निवडणुका असून, विद्यमान नगरसेवकांचे हे अंतिम बजेट आहे.\
४५ कोटींचे रस्ते, ४६४ कोटींची भुयारी गटार योजना, समांतरसाठी दरमहा साडेपाच कोटी रुपये, पथदिव्यांसाठी मनपाला प्राधान्यक्रम देऊन खर्च करावा लागणार आहे. शिल्लक कामांचा डोंगर १०० कोटींवर गेला आहे.