शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाआड पाणी, तेही दूषित

By admin | Updated: August 2, 2014 01:08 IST

धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच.

धर्माबाद : येथील पालिकेने नळपट्टीत वाढ केली, त्यामुळे पाणीसमस्या कमी होईल, अशी अपेक्षा धर्माबादकरांची होती, झाले उलटेच, पाणीसमस्या कमी होण्याऐवजी ती वाढलीच. सध्या शहराला एक दिवसाआड पाणी येत आहे, तेही दूषित. नगराध्यक्षांनी मात्र गोदावरी नदीतील पाणी आटल्याचा हा परिणाम असल्याचे नमूद केले.धर्माबाद शहरात २५९० वैयक्तिक व अधिकृत नळकनेक्शनधारक आहेत. शहरात सार्वजनिक नळ किती आहेत? याची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाहीत, अनधिकृत नळांचे तर विचारुच नका. एप्रिल ते जून या दरम्यान पालिकेने दीड लाख रुपयांची वसुली केली. गतवर्षी गोदावरी नदीला भरपूर पाणी असल्याने धर्माबादकरांना दररोज पाणी मिळत होते. तेही दूषित होते. यंदा नदीचे पाणी आटल्याचे कारण सांगून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.शहरवासियांना वार्षिक नळपट्टी ८०० रुपये आकारण्यात येत होते, आता १२०० रुपये घेतले जात आहेत. एक दिवसाआड पाणी आणि १२०० रुपये नळपट्टी. याचे गणित लोकांना कळाले नाही. १२०० रुपये काय म्हणून भरायचे? असा सवाल नागरिकांचा आहे. नियमित पाणी द्या आणि त्याच पद्धतीने नळपट्टी घ्या, असे लोकांचे म्हणणे आहे. पाणीच नाही तर टॅक्स का वाढविला जातो, याचे उत्तर शहरवासियांना हवे आहे. बहुतांश ठिकाणी पाईप फुटलेले आहेत. दूषित पाणी पाईपमध्ये जाते आणि तेच पाणी शहरवासीयांना पुरविले जाते, आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करुन पाणी दूषित असल्याचा अहवाल पालिकेला दिला, मात्र पालिकेचे ढिम्म प्रशासन हलायला तयार नाही, प्रशासनाने काहीही कारवाई केली नाही. दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली पालिकेला साडेचार कोटी रुपये प्राप्त झाले, त्याचा उपयोग का केला जात नाही? याचे गौडबंगाल काय? हे लोकांना समजले पाहिजे. याशिवाय नळपट्टीच्या वसुलीचे काय होते? तोही पैसा कुठे जातो? याचे गणितही लोकांना कळत नाही. शहरातील बहुतांश हातपंप बंद पडलेले आहेत. हातपंपांची दुरुस्तीही केली जात नाही. नळाला पाणी येत नसल्याने शहरवासीय आता ‘फिल्टर’च्या पाण्याकडे वळले. त्याचा आर्थिक फटका लोकांना बसत आहेत. (वार्ताहर)गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी, यंदा १२०० गोदावरी नदीत पाणी नसल्यामुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाणी येत आहे. गोदावरी नदीत बोअर मारण्याच्या कामाला मंज़ुरी मिळाली आहे, लवकरच टेंडर निघेल- विनायकराव कुलकर्णी, नगराध्यक्षगोदावरी नदीत पाणी नाही, त्यामुळे एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. गतवर्षी ८०० रुपये नळपट्टी होती, यंदापासून नळपट्टी १२०० रुपये करण्यात आली- निलेश सुंकेवार, मुख्याधिकारी, पालिका, धर्माबादशहरातील नळ कनेक्शनमध्ये वाढ करण्यात आली, मात्र गोदावरी नदीतच पाणी नसल्याने शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याशिवाय गत्यंतर नाही- बिरप्पा मदनूरकर, सभापती, पाणीपुरवठा विभाग, धर्माबाद