शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट निम्म्यावरच अडखळले !

By admin | Updated: November 24, 2014 00:35 IST

लातूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून,



लातूर : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, २०१४-१५ साठी लातूर जिल्ह्याला ३६ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले असतानाही सध्यापर्यंत ८ हजार ७१४ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. हे उद्दिष्ट ११ महिन्यांनंतरही निम्म्यावरच अडखळले आहे.
‘निर्मल भारत अभियान’चे नामकरण करून २ आॅक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) असे नामकरण करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालयाकरिता केंद्राचा हिस्सा ९ हजार (७५ टक्के) व राज्याचा हिस्सा ३ हजार (२५ टक्के) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वच्छतागृहाच्या मोहिमेला गती येणे आवश्यक आहे. परंतु, लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २०१४-१५ या कालावधीत सध्यापर्यंत ८७१४ एवढ्या बोटांवर मोजण्याइतकेच स्वच्छतागृह झाले आहेत. तर उर्वरित २७ हजार २८६ स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. याउलट जिल्हा परिषद प्रशासन स्वच्छतागृहाच्या बाबतीत लातूर जिल्हा राज्यात अग्रस्थानी असल्याचा डंका वाजवीत आहे. (प्रतिनिधी)४
‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत शौचालय निर्मितीला गती देण्यात येत असली, तरी वर्षभरासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट निम्म्यावरच आहे. याला गती देण्यासाठी शौचालय उभारणीसाठी अनुदानाची जनजागृती करण्याऐवजी कमी खर्चामध्ये शौचालय उभारणीची जनजागृती करावी. यामुळे सर्वसामान्य नागरिकांतूनही शौचालय निर्मितीसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण होईल, असे जिल्हा परिषदेच्या बहुतांश सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शौचालय निर्मितीसाठी केंद्र व राज्य शासन नवनवीन योजना अंमलात आणत असले तरी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांना शौचालय उभारणीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आदेश दिले असतानाही शौचालय उभारणीबाबत अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांच्यामध्ये शौचालय उभारणीबाबत उदासिनताच दिसून येत आहे.