शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आता लातुरातील वितरण व्यवस्था मजबूत करावी

By admin | Updated: April 16, 2016 00:12 IST

लातूर : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होतोय आणि आता माकणीहून पाणी येतेय, पण शहरात मात्र त्याचा पुरवठा विस्कळीत आहे,

महसूलमंत्र्यांच्या मनपा आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना : महापौर बरळले, नळ योजनेत गळती नाही, मीडिया खोटे सांगतेलातूर : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होतोय आणि आता माकणीहून पाणी येतेय, पण शहरात मात्र त्याचा पुरवठा विस्कळीत आहे, यावर बोट ठेवीत महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी मनपा आणि जिल्हाधिकाऱ्यांना वितरण व्यवस्थेत लक्ष देण्याच्या सूचना केल्या. शुक्रवारी आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते वितरणाच्या मुद्यावर बोलत होते. ते म्हणाले की, आतापर्यंत आम्ही लातूर शहरात पाणी आणायची चिंता करीत होतो. कारण पाणीच नव्हते आणि आणणे हाच मुख्य मुद्दा होता. आता पाणी लातूर शहरापर्यंत आणले आहे. आणलेले पाणी इथून वाटायचे कसे ? हा पहिला प्रश्न आम्ही सोडविला. आता दुसरा प्रश्न वितरणाचा आहे. नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये गळती असल्याने नळाने पाणी देणे अशक्य आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरने पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक !जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या पाण्याबाबत केलेल्या कामाचे महसूलमंत्री खडसे यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, इतक्या कमी दिवसामध्ये प्रशासनाने यंत्रणा उभारली हे कौतुकास्पद आहे. (प्रतिनिधी) महापौर बरळले : गळती असल्याचे मीडिया खोटे सांगतेय !महसूलमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये लातूरचे महापौर अख्तर शेख यांनी आपल्या शहराची नळ पाणीपुरवठा योजना समृध्द असल्याचे सांगत गळतीचे खापर मीडियावर फोडले. शहरात कुठेही लिकेज नाहीत की पाणी वाया जात नाही. मीडिया चुकीचे दाखवित असल्याचा दावा केला. याची सावरासारव करताना खुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच ‘तुमच्या माझ्या कुणाच्याही गावात गेले तर नळाच्या पाण्याला गळत्या असतात’ असे सांगून टँकरच्या पाण्यावर ठाम राहीले. शिवाय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना वितरणावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही केल्या.उदगीरला टंचाई असल्यास रेल्वेचाही विचार करु आढावा बैठकीत आ. सुधाकर भालेराव यांनी उदगीरची पाणीटंचाईही गंभीर असल्याचे सांगून रेल्वे ट्रॅक असल्याने या शहराला सुध्दा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावर पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले की, उदगीर शहराला पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे कानावर आले आहे. याही शहराला रेल्वेने पाणी द्यावे, अशी मागणी झाली आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येईल. आवश्यकता वाटली तर विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. लातुरात झाली लातूर, बीड आणि उस्मानाबादच्या अधिकाऱ्यांची बैठक... लातुर दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लातूर, बीड आणि उस्मानाबादच्या अधिकाऱ्यांची लातूरच्या शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. यावेळी खा. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख, आ. सुधाकर भालेराव, आ. संभाजीराव पाटील-निलंगेकर, आ. त्र्यंबकनाना भिसे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, महापौर अख्तर शेख, जि. प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेस्टेशनवरील फिडरचे खडसेंच्या हस्ते पूजन... लातूर रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेल्या रेल्वे वॅगनमधून पाणी उतरविण्यासाठी आणि साठविण्यासाठी बसविण्यात फिडरचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनवरील सर्व यंत्रणांची पाहणी केली.