शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उजाड माळरानावर साकारले निसर्ग पर्यटन केंद्र

By admin | Updated: September 7, 2014 00:24 IST

राम तत्तापूरे , अहमदपूर अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत वन विभाग उस्मानाबाद परिक्षेत्र अहमदपूरच्या

राम तत्तापूरे , अहमदपूरअहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत वन विभाग उस्मानाबाद परिक्षेत्र अहमदपूरच्या ४० एकर वनक्षेत्रावर लातूर जिल्ह्यातील सर्वसोयीयुक्त असे निसर्ग पर्यटनकेंद्र उभारण्यात आले असून, ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे़ तालुक्यातील उजाड मन्याड खोऱ्याच्या माळरानावर तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी आऱजी़मुद्दमवार, विभागीय वनअधिकारी बी़एनक़दम, वनरक्षक एऩएस़बिराजदार यांच्या संकल्पनेतून ४० एकरच्या उजाड माळरानावर निसर्ग पर्यटन केंद्र करण्याचा संकल्प दोन वर्षापूर्वी करण्यात आला़ त्या दृष्टीेने अहोरात्र परिश्रम करून शासनाच्या मदतीने लिंबोटी धरणात १५ एच़पी़ची मोटार टाकून पाण्याची सोय केली़ दोन किलोमीटर अंतरावरून ४ इंचाची पाईपलाईन केली़ १ लाख लिटर्स पाणी साठवणाची सोय केली़ त्या माध्यमातून १० हजार वृक्षांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करून त्या वृक्षाची जोपासना करण्याचे काम सुरु करण्यात आले़ वन परिक्षेत्राच्या मधोमध पाहणी मनोरा करण्यात आला असून, ४० एकरवर उभारण्यात आलेल्या पर्यटन क्षेत्रावर देखणे रस्ते, पूल आणि रस्त्याच्या दूतर्फा नारळ, गोगनबेल, रिकोमा, कन्हेरी, जास्वंद, गुलाब, स्वास्तिक, सदाफुली, झेंडू, शेवंती, पिवळी कन्हेरी तर बाकीच्या वनक्षेत्रावर वनौषधी आणि दुर्मिळ लोप पावत असलेल्या रोपांची लागवड करण्यात आली़ यामध्ये विशेष करून बिबा, पिंपळ, आंबा, आवळा, लिंब, मोघणी, जांभूळ, पॅथोडिया, सिसम, सिरस, सिसू, मोहगणी, लक्ष्मीतरू, कांचन, कॉरिआ, वॉटर ब्रश, सप्तपर्णी, चिंच, मोरपंखी, मद्राक्ष, सिल्व्हर ओके, बांबू, आकाश मोगरा, फणस, साग, चंदन, हत्तीफळ, बेल, ईडी, करवंद आदीं वृक्षांनीपर्यटन केंद्र फुलून गेले आहे़ हे वन मन्याड नदीच्या तिरावर उभारण्यात आल्याने या वनामध्ये ससे, हरिण, राणडुक्कर, सायाळ, सापांच्या विविध जाती, पक्षी, घुबड, कोकीळा, चिमणी, निळकंठ, घार, कबूतर इतर दुर्मिळ पक्षी दिसून येतात़ या पर्यटनाच्या माध्यमातून पशुंच्या पाण्याच्या सोयीसाठी सुंदर अशी पाणपोई उभारण्यात आली आहे़ तसेच लहान मुलांसाठी घसरगुंडी, झुले, सिसॉ, डबल डेकर, डबलबार आदी सुविधा निर्माण केल्या आहेत़ तसेच वृद्ध व ज्येष्ठांसाठी दर्जेदार लॉन्स, फिरण्यासाठी पॅच तयार करण्यात आला आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र मिनरल वॉटर प्लँटही बसविण्यात आला आहे़ या नव्या पर्यटन स्थळास भेट देण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे़\या पर्यटन केंद्राची सुरुवात २०१२ मध्ये करण्यात आली़ २०१४ मध्ये निसर्ग पर्यटनस्थळाचे काम पूर्ण झाले़ या पर्यटन क्षेत्रात भर पडावी या दृष्टीकोनातून आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तहसीलदार विजय अवधाने, पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़