शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या आधी माझे शहर म्हणजे ‘औरंगाबाद फर्स्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:03 IST

नागरिकांच्या सहभागातून प्रश्न सोडविण्यासाठी उभी राहणार व्यापक चळवळ

ठळक मुद्देशहरातील विविध प्रश्नांवर नागरिकांचा एक दबाव गट स्थापन व्हावा

औरंगाबाद : शहरातील विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी, तसेच हे प्रश्न सोडविण्यामध्ये नागरिकांचा सहभाग असावा या दृष्टीने ‘मराठवाडा एन्व्हायर्नमेंटल केअर क्लस्टर’ याअंतर्गत ‘औरंगाबाद फर्स्ट’ ही संस्था काही वर्षांपासून काम करीत असून, आगामी काळात नव्याने रस्ते, वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छ आणि हरित औरंगाबाद, वाहतूक शिस्त आणि सुरक्षा, महापालिकेच्या खुल्या जागा या मुद्यांवर ही संस्था काम करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उद्योजक मानसिंग पवार यांनी बुधवारी दिली. 

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी झालेल्या चर्चेत मानसिंग पवार यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून ‘औरंगाबाद फर्स्ट’ ही संस्था कार्यरत आहे. संस्थेने काही प्रकल्पही मार्गी लावले आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण, औद्योगिक वसाहतींमध्ये स्वच्छता अभियान, मलनिस्सारण प्रकल्प आदी प्रकल्प राबविले आहेत. औरंगाबाद शहरातील विविध प्रश्नांवर नागरिकांचा एक दबाव गट स्थापन व्हावा या हेतूने आणि हे प्रश्न सोडविण्यामध्ये नागरिकांचा सहभागही असावा. नागरिकांच्या सहभागातून आपलेच प्रश्न सोडविण्यासाठी एक व्यापक चळवळ उभी राहावी, हा यामागचा हेतू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मागण्यांची सनदही देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी काय असते, याचीही सनद आम्ही मांडणार आहोत. शहरातील वाहतुकीच्या मुद्यावर आम्ही जगजागृतीपर कार्यक्रम घेणार आहोत. शहरात सुमारे ३७ हजार रिक्षाचालक आहेत. येत्या काही दिवसांत रिक्षाचालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहितीही मानसिंग पवार यांनी दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र कोंडेकर, कोषाध्यक्ष अनिल माळी, रमेश नागपाल, विवेक भोसले, समन्वयक हेमंत लांडगे, निखिल भालेराव, अभिजित हिरप उपस्थित होते. 

आमच्यासोबत विविध क्षेत्रांतील लोकयावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष राम भोगले म्हणाले की, समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन काही केले तर खूप काही होऊ शकते. यादृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करीत आहोत. आमच्यासोबत डॉक्टर, वकील, प्राध्यापक आदी मंडळी आहेत. यापूर्वी आम्ही स्वच्छता, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेतले आहेत. नव्याने शहरासमोरील काही समस्यांबाबत काम करणार आहोत. 

टॉप शहरांमध्ये समावेश व्हावायावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष रिषी बागला म्हणाले की, औरंगाबाद शहर सध्या देशात २०० व्या क्रमांकापेक्षाही खाली आहे. इंदूर, सुरत ही शहरे पूर्वी औरंगाबादपेक्षाही अस्वच्छ होती. आता ती देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. औरंगाबाद शहराचादेखील २०२५ पर्यंत देशातील प्रमुख शहरांमध्ये समावेश व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी औरंगाबाद फर्स्ट ही संस्था काम करणार आहे. या शहरात बाहेरून खूप लोक आले. त्यांना या शहराने खूप काही दिले. आपलेही या शहरासाठी काही देणे लागते या भावनेतून या शहराला एका उंचीवर नेण्याची गरज आहे. माझ्याआधी माझे शहर म्हणजे ‘औरंगाबाद फर्स्ट’ अशी संकल्पना आहे. 

या मुद्यांवर संस्था करणार काम- शहरातील पार्किंगची समस्या- बीओटीवरील प्रकल्प- रस्ते सुशोभीकरण- सार्वजनिक शौचालये- पाण्याचे नियोजन- स्मार्ट वॉर्ड, स्मार्ट नगरसेवक- मनपा शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण- याशिवाय पर्यावरण, पाणी, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंबंधी माहितीचे संकलन केले जाणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका