शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

अनाधिकृत आरो वॉटर प्लांट संकटात; कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मनपाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 12:57 IST

कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता गल्ली बोळांमध्ये पाण्याचे जार विकण्याचा धंदा सुरू आहे.

ठळक मुद्देकमी खर्चाच्या गुंतवणुकीत लाखो रुपये कमविण्याचा उद्योग म्हणजे आरो प्लांट हाेय. दीडशेपेक्षा अधिक आरो प्लांट शहरात असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले होते.

औरंगाबाद : राष्ट्रीय हरित लवादाने राज्यात सुरु असलेल्या अनधिकृत रिव्हर्स ऑस्मोसिस’ (आरओ) वॉटर प्लॅन्टकडे मोर्चा वळविला आहे. अवैध प्रकल्प बंद करण्याचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवले. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपा आयुक्तांना शहरातील अवैध प्रकल्प बंद करावेत असे पत्र पाठविले आहे. दीडशेपेक्षा अधिक आरो प्लांट मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे सुरू आहेत. या प्लांटवर आता संकट येणार हे निश्चित.

कमी खर्चाच्या गुंतवणुकीत लाखो रुपये कमविण्याचा उद्योग म्हणजे आरो प्लांट हाेय. कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी न घेता गल्ली बोळांमध्ये पाण्याचे जार विकण्याचा धंदा सुरू आहे. जमिनीतील लाखो लिटर पाण्याचा दररोज उपसा करून ते विकण्यात येत आहे. महापालिकेने आजपर्यंत आपल्याकडे कारवाईचे अधिकार नाहीत म्हणून डोळेझाक केली. काही वर्षांपूर्वी महापालिकांनी शहरात पाण्याचे आरो प्लांट किती आहेत यासंबंधीचे सर्वेक्षण केले होते. दीडशेपेक्षा अधिक आरो प्लांट शहरात असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले होते.

शहरात बॉटलिंग आणि थंड पाणी करण्याचे प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरण आणि सक्षम प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. त्या शिवाय हे प्रकल्प सुरु करता येत नाही, असा नियम आहे. या संदर्भात काही नागरिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली. या तक्रारींची दखल घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून राज्यात सुरु असलेले अवैध प्रकल्प सील करावेत अशी सूचना केली. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका क्षेत्रात बॉटलिंग आणि विहीर, विंधनविहीर, नळाचे पाणी थंड करुन विक्री करणारे अवैध प्रकल्प बंद करावेत असे पत्र मनपा आयुक्तांना पाठवले आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पाणी प्रकल्प नोंदणीकृत असावानियमाप्रमाणे पिण्याचे पाणी शुध्दिकरण प्रकल्प नोंदणीकृत असावा, आयएसआय मार्क हवा, पाण्याच्या परीक्षणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रात ९९ टक्के आरो प्लांट चालकांकडे परवानगी नाही. विना परवानगी पाणी विक्री होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या अवैध प्रकल्पांवर कारवाई करावे असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्राव्दारे मनपा आयुक्तांना कळविले आहे.

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण