शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
5
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
6
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
7
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
8
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
9
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
10
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
11
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
12
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
13
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
14
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
15
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
16
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
18
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
19
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
20
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: August 10, 2014 00:09 IST

सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा़ बंडू जाधव यांनी दिली़

परभणी : पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ अतिवृष्टीमुळे रबी हंगाम गेला आणि पावसाअभावी खरीप हंगामही गेला आहे़ त्यामुळे मराठवाड्यासह परभणी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा़ बंडू जाधव यांनी दिली़
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी ११ आॅगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे़ या मोर्चाच्या तयारीसंदर्भात माहिती देण्यासाठी खा़ बंडू जाधव यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली़ ते म्हणाले, मराठवाडा वगळता अन्य भागात पाऊस आहे़ परंतु, मराठवाड्यात मात्र कोरडा दुष्काळ पडला आहे़ ही परिस्थिती आपण केंद्र शासनाकडे मांडली आहे़ परंतु, राज्य शासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे़ जिल्ह्यातील पिके असमाधानकारक आहेत़ शेतकऱ्यांच्या हाताला काहीही लागलेले नाही़ त्यामुळे नैराश्येत असलेल्या या शेतकऱ्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे़ त्यामुळेच बैलगाडी मोर्चाद्वारे सरकारला जागे केले जाणार आहे़ मराठवाड्यासाठी केंद्राकडून पाहिजे ती मदत मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु़ त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या पायी मोर्चा संदर्भात आ़ जाधव म्हणाले सत्तेत असताना मोर्चा काढावा लागतो हे दुर्भाग्य आह़े़ मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे़
या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व पक्षांनी मिळून रस्त्यावर उतरले पाहिजे़ अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वांनी मिळून पुढाकार घेतल्यास आम्ही त्याचे स्वागत करू, असेही ते यावेळी म्हणाले़
अतिवृष्टीतील नुकसानीची मदत अनेक गरजू लोकांपर्यंत पोहचली नाही़ त्यामुळे दुष्काळ जाहीर केला तरी गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचावी, यासाठी पारदर्शकपणे मदत वाटप करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली़ पीक कर्ज वाटपातही मोजक्याच लोकांना बँकाकडून कर्ज वाटप होत असल्याचे ते म्हणाले़ या पत्रकार परिषदेला युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, डॉ़ संजय कच्छवे, जि़प़तील गटनेते गंगाधरराव कदम यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)