शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

औरंगाबादेत ७ लाख कॉल ट्रान्झॅक्शन्सला मोबाईल नेटवर्क जामचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:28 IST

कारवाई न झालेल्या उर्वरित टॉवरवर मोबाईल नेटवर्कचा भार 

ठळक मुद्देकारवाईत २०० टॉवर सील केल्याने ग्राहकांना फटका ३२ कोटींहून अधिकची थकबाकी मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे आहे.

औरंगाबाद : महापालिकेच्या अनधिकृत मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई सुरू केल्यामुळे मोबाईल नेटवर्क जाम होत असून, ‘कॉल ड्रॉप’ होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या एक दिवस बिल भरण्यास अथवा रिचार्ज करण्यास विलंब झाला, तर फोनचा संवाद आणि इंटरनेट सेवा बंद करतात; परंतु तीन दिवसांपासून ग्राहकांना सेवा सुरळीत मिळत नसल्यामुळे कंपन्या त्याची कशी भरपाई करणार, असा प्रश्न आहे. 

३२ कोटींहून अधिकची थकबाकी मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे आहे. ती थकबाकी मिळण्यासाठी मनपाने टॉवर्स सील करण्याची कारवाई सुरू केली असून, सुमारे ७ लाख कॉल ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच फोन करणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. महापालिका हद्दीत ५९५ मोबाईल टॉवर्स आहेत. त्यातील २०० च्या आसपास टॉवर्स मनपाने थकबाकीपोटी सील केले आहेत. परिणामी टॉवर्सच्या बॅटरीज, जनरेटरमधील इंधन संपले असून, ते भरण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी यंत्रणा नियुक्त केली आहे. त्यांना काहीही करता येत नसल्याने टॉवर बंद आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना मिळणारे नेटवर्क कनेक्शन ठप्प पडले आहे. इंटरनेट आणि संवाद सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत बीएसएनएल अथवा इतर कोणत्याही कंपनीच्या स्थानिक अथवा झोन व्यवस्थापकांनी कुठलीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. 

कॉल ड्रॉपची माहिती घ्यावी लागेलशहरात मोबाईल टॉवर सील झाल्यामुळे किती मोबाईलधारक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे, याची माहिती घ्यावी लागेल. बीएसएनएलचे सर्व टॉवर्स अधिकृत आहेत. इतर कंपन्यांच्या टॉवर्सवरून किती ग्राहकांना सेवा मिळते, याची माहिती घ्यावी लागेल. राजेंद्र गांधी, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल 

तांत्रिक माहिती अशी : बीएसएनएलच्या तांत्रिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका टॉवरवरून दिवसातून टूजी, थ्रीजीचे ३ ते साडेतीन हजार कॉल ट्रान्झिट होतात. म्हणजेच फोन केले जातात. एक व्यक्ती दिवसातून अनेकदा फोन करते. त्यानुसार ही सरासरी असते; परंतु त्याचा निश्चित आकडा सांगता येणार नाही. बॅटरी आणि जनरेटरमधील इंधन संपल्यास टॉवर बंद पडते. ते सील केल्यामुळे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना टॉवरच्या आत जाता येत नाही. परिणामी टॉवर बंद पडते. टॉवर बंद पडले की, नेटवर्क बंद पडते. त्यामुळे मोबाईलधारकांना इंटरनेट आणि कॉल सुविधा मिळत नाही. मोबाईल ही अत्यावश्यक सेवा  आहे. त्यामुळे कोणतीही कारवाई होण्यापूर्वी कंपन्यांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी टॉवर्सकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०० टॉवर जर सील झाले असतील, तर त्याचा परिणाम ७ ते ८ लाख कॉल ट्रान्झिकशन्सवर झाला असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाईल कंपन्या     टॉवर्सची संख्या रिलायन्स जिओ    १६१इंडस टॉवर    ९८बीएसएनएल    ५१व्होडाफोन    २८टाटा    ३५आयडिया    ३१एटीसी    ६१एअरटेल    ६०इतर    ७०एकूण     ५९५

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेटAurangabadऔरंगाबादTaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका