शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पारा गेला ४१ अंशावर !

By admin | Updated: March 27, 2016 00:10 IST

जालना : यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. शनिवारी जालन्याचा पारा तब्बल ४१ अंशांवर गेल्याने उष्णतेमुळे शहरवासियांचे हाल झाले.

जालना : यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. शनिवारी जालन्याचा पारा तब्बल ४१ अंशांवर गेल्याने उष्णतेमुळे शहरवासियांचे हाल झाले. दुपारनंतर सर्वच रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. काही रस्ते निर्मुनष्य झाल्याचे चित्र होते. एकूणच कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. शहरवासियांना मे हिटचा अनुभव येत आहे.दोन दिवसांपासून पारा ३८-३९ अंशांवर स्थिरावत होता. शनिवारी दुपारी १ ते ४ वाजे दरम्यान उन्हाचा पारा ४१ अंशांवर गेला होता. सकाळी १० वाजता ३२ अंशांवर असणारे तापमान दुपारी ४ वाजता ४१ अंशावर गेले होते. उष्णतेच्या तीव्रतेमुळे आबालवृद्धांचे हाल होत असून, काहींनी घराबाहेर पडणे टाळले. तालुकास्थानेही कडक उन्हामुळे चांगलीच तापली होती. यात प्रामुख्याने बदनापूर, भोकरदन, जाफराबादचे तापमान ३७ अंश होते. तर घनसावंगी, अंबड, परतूरचे तापमान ३८ अंश होते. मंठ्याचे तापमान वाढले असून, शनिवारी पारा ३९ अंशांवर गेला होता. शहरासोबतच ग्रामीण भागातही उन्हामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जानेवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काही काळ दिलासा मिळाल्यानंतर उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली आहे. तापमानात वाढ होत जाईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गत वर्षी याच दिवशी तापमान ३८ अंश एवढे होते. यावर्षी यात तब्बल ३ अंशांनी वाढ होऊन ४१ पर्यंत केले. कडक उन्हाचा फटका भाजीपाला उत्पादनावर होत आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे जलसाठ्यांतही झपाट्यान घट झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तापमान वाढत असल्याने ग्रामीण भागातील आठवडी बाजारावर परिणाम होत आहे.लग्नसराईचे दिवस असूनही कडक उन्हामुळे गर्दी रोडावत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे अर्थचक्रावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. कडक उन्हामुळे थंडपेयांची विक्रीत चांगली वाढ झाली आहे. शहाळे, टरबूज, द्राक्ष तसेच उसाच्या रसासह इतर शीतपेयांना मागणी वाढली आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून बहुतांश नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. उन्हामुळे रुग्णालयांत गर्दी वाढत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, रूमालांची मागणी वाढत आहे.