शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मरसांगवीला ‘माळीण’ची भिती

By admin | Updated: September 11, 2014 01:07 IST

एम़ जी़ मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़

एम़ जी़ मोमीन , जळकोटजळकोट तालुक्यातील मरसांगवी साधारणत: अडीचशे उंबऱ्यांचे गाव़़़ जवळपास शंभरएक वर्षापूर्वीपासून याठिकाणी वस्ती झालेली़़़ डोंगराच्या पायथ्याशी आता चांगलीच पक्की घरे वसली आहेत़ परंतु, आता येथील गावकऱ्यांना ‘माळीण’ दुर्घटनेने जबर धास्ती बसली आहे़ डोंगर खचून मरसांगवीचे माळीण होईल, या भीतीने ग्रामस्थ ग्रासले आहेत़ जळकोटपासून १५ किलोमीटर अंतरावर मरसांगवी या गावाच्या वसाहतीला शंभर वर्षापूर्वी सुरुवात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात़ हळुहळु लोकसंख्या वाढली तशी घरांची संख्याही वाढली़ आज हे गाव अडीचशे उंबऱ्यांचे बनले आहे़ लोकसंख्याही २२४९ इतकी झाली आहे़ पूर्वी शेजारच्याच डोंगरमाथ्यावर वस्ती वसलेली होती़ परंतु, पाण्याची अडचण होऊ लागल्याने हळुहळु वस्ती डोंगराच्या पायथ्याशी उतरली़ तिरु व परठोळ नद्यांच्या संगमावर कालांतराने वस्ती वाढत गेली़ मात्र आजतागायत या गावाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले नसल्याने सर्व काही सुखनैव सुरु होते़ मात्र गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव डोंगराच्या उदरात गडप झाल्याच्या बातम्या वाचून, पाहून मरसांगवीकरांची झोप उडाली आहे़ माळीण दुर्घटनेला महिना झाल्याच्या बातम्या पुन्हा एकदा आल्या अन् मरसांगवीकर खडबडून जागे झाले़ त्यांनी तातडीने सरपंचाशी चर्चा करुन तलाठी व ग्रामसेवकाच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेतली़ गावावर पाऊस धो-धो बरसल्यास दरडी कोसळून माळीण सारखी आपत्ती कोसळण्याची भिती या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केली़ त्याअनुषंगाने गावातील घरांचे पंचनामे करुन गावाचे पुनर्वसन करावे, अशी एकमुखी मागणी करीत ठराव घेण्यात आला़ ठरावाच्या प्रती महसूल प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत़ यावर प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे़माळीणची दुर्घटना पाहिल्यापासून डोंगराच्या उदरात गडप झालेले गाव आजतागायत डोळ्याआड झाले नाही़ अधूनमधून येणाऱ्या बातम्यांनी ही भीती ताजी होत आहे़ पावसाला सुरुवात झाली की अजूनही ग्रामस्थांची झोप उडते आणि माळीणचे चित्र डोळ्यासमोर तरळते अशी प्रतिक्रिया सरपंच नजमा बेगम पटेल, ऐनुद्दीन पटेल, बाबु भांडे, तानाजी राठोड, राजकुमार वाघमारे, मैनुद्दीन बिराजदार, संजय वाघमारे, संग्राम देवकते या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या़