शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

औरंगाबादेत कचरा, पाणी प्रश्नावर मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:53 AM

शहरातील कचराकोंडी आणि गंभीर पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ढोल वाजवत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. उपायुक्तांच्या दालनात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करीत शिष्टमंडळाने प्रशासनाकडून लिहून घेतले की, पंधरा दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. शहरातील प्रत्येक वसाहतीला तीन दिवसाआड पाणी देण्यात येईल.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी आणि गंभीर पाणी प्रश्नावर शुक्रवारी सकाळी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ढोल वाजवत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन केले. उपायुक्तांच्या दालनात तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन करीत शिष्टमंडळाने प्रशासनाकडून लिहून घेतले की, पंधरा दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल. शहरातील प्रत्येक वसाहतीला तीन दिवसाआड पाणी देण्यात येईल.सकाळी ११ वाजताच मनसे कार्यकर्ते महापालिकेसमोर दाखल झाले. त्यांनी ढोल वाजविणे सुरू केले. शहरात १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत २७० एमएलडी पाण्याचा साठा होतो. काही भागांत पाचव्या व सहाव्या दिवशी पाणी का दिले जाते, असा सवाल त्यांनी केला. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांच्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर यापुढे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख विक्रम मांडुरके यांनी येत्या १५ दिवसांत कचऱ्याची समस्या सोडवू, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, आशिष सुरडकर, अब्दुल रशीद, गजन गौडा, संतोष पवार, संकेत शेटे, अशोक पवार, भारत गायकवाड, राजेश पुरी, उमेश दीक्षित, सुरेंद्र वाडेकर, वंदना गाढे, अनिता लोमटे, लीला राजपूत, सपना ढगे आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादWaterपाणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMNSमनसे