शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Maharashtra Election 2019 : 'फसवणूक सरकार' घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 4:22 PM

दिलेला शब्द न पाळणारे, सामान्यांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही.

ठळक मुद्दे या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही,

वैजापुर : दिलेला शब्द न पाळणारे, सामान्यांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही, असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजप सरकारला टोला लगाविला. वैजापुर विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार अभय पाटिल चिकटगावकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

विधानसभेचा प्रचार रंगात आला असून, वैजापुर मतदारसंघासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या शैलित मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस यांच्यावरच शरसंधान साधले.  यावेळी शरद पवारांनी युती सरकारवर  जोरदार टीका केली. पवार म्हणाले की, महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद, ५२ वर्ष सलग माझ्यावर प्रेम केलं. मला आता सत्ता तरुणाच्या हाती द्यायची आहे. गेल्या दोन महिन्यात नाशिकमधील कारखान्यात १५ हजार कामगार कामावरून कमी केले. औरंगाबाद जिल्ह्यात देखील हीच अवस्था आहे. म्हणून बदल हवा आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, शेतकऱ्यांवर प्रेम असल्याचा देखावा करत कर्जमाफी केल्याचा नुसता देखावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. अजूनही राज्यातील ६१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत न मिळाल्याने त्यांची परिस्थिती गंभीर आहे. यामध्ये तर एका कुटुंबाच्या घरी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अर्धे मंत्रिमंडळ भेट देऊन आले होते. त्यामुळे अशा अकार्यक्षम, संवेदनाहीन सरकारला खुर्चीवरून खाली खेचायला हवे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ.सतीश चव्हाण,आ.भाऊसाहेब पा.चिकटगावकर,प्रमोद जगताप,प्रताप निंबाळकर,अभिजीत देशमुख,प्रशांत सदाफळ,यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vaijapur-acवैजापूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस