शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यांची परराज्यातूनच मोठी आवक

By admin | Updated: May 14, 2014 00:40 IST

जालना : शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमधून यावर्षी जिल्हा, विभाग किंवा राज्याबाहेरच्या आंब्याचीच मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे.

जालना : शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमधून यावर्षी जिल्हा, विभाग किंवा राज्याबाहेरच्या आंब्याचीच मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. गेल्यावर्षी या जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे जिल्हावासिय त्या दुष्काळाने होरपळून निघाले होते. विशेषत: टंचाईने हैराण होते. अपुर्‍या पावसाने व तीव्र टंचाईने जिल्ह्याचे जनजीवनच ठप्प होते. त्याचा परिणाम म्हणजे गेल्यावर्षी बाजारपेठांमधूनसुद्धा कमालीचा शुकशुकाट होता. त्याचा फटका आंब्याच्या बाजारपेठेने अनुभवला. गेल्यावर्षीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वदूर बर्‍यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकरी सुखावला होता. खरिपापाठोपाठ रबीनेही आशा उंचावल्या होत्या. उन्हाळी पिकांबरोबरच यावर्षी आंबाही बहार आणेल, असा अंदाज व्यक्त होत असताना या जिल्ह्यास वादळी वार्‍यांसह गारपिटीने एकदा नव्हे सहा वेळा झोडपून काढले. घनसावंगी, अंबड, बदनापूर, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद या आठही तालुक्यांत सर्वदूर हेच चित्र होते. त्यामुळे रबी व उन्हाळी पिके जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर आंब्याच्या झाडांना आलेला मोहर पूर्णत: गळून पडला. काही भागात पाना फुलांची मोठ्या प्रमाणावर गळती झाली. झाडे बोडखी झाली. काही ठिकाणी तर झाडेही उन्मळून पडली. या पार्श्वभूमीवरच याही वर्षी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेवर आंब्याचा तुटवडा जाणवणार, हे स्पष्ट होते. अपेक्षेप्रमाणे अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर आंब्याची म्हणावी एवढी आवक झाली नाही. त्यामुळे आंब्याचे भाव कडाडले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक बाजारपेठेत जिल्ह्याबाहेरच्या विशेषत: राज्याबाहेरच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश इ. राज्यांतून आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. गुजरातमधून केशर व दसेरी आंबे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. दररोज जालना किंवा अन्य तालुकास्थानी किमान डझनभर ट्रकव्दारे हा आंबा दाखल होत असून, तो हातोहात विकलाही जात आहे. काही भागात आंध्रमधून बदाम प्रकाराचा आंबा दाखल झाला असून, केशर आणि दसेरीच्या तुलनेत हा आंबा स्वस्त आहे. (प्रतिनिधी) आंब्याच्या बाजारपेठेत सध्या ६० ते ८० रुपये किलो प्रमाणे दर असून, हे दर आणखी उतरतील असा अंदाज आंबा विक्रेते करीत आहेत. यावर्षी कोकणातून मोठ्या प्रमाणावर हापूस व देवगड, पायरी, आंबा दाखल होईल, असा अंदाजही काही व्यापार्‍यांनी वर्तविला असून, कोकणातून परदेशात जाणार्‍या आंब्याची निर्यात थांबल्यानेच हापूसची आवक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फळविक्रेत्यांनी आंबा पिकविण्यासाठी कार्बाईडचा मुक्तपणे वापर सुरू केला आहे. त्यामुळे बाजारपेठांतून कलमी असो की अन्य आंबे पिवळे भडक दिसू लागले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी फळविक्रेत्यांना इशारा दिला होता खरा, परंतु त्यांच्या विरोधात आजपर्यंत औषधालाही कारवाई न केल्याने जागरूक ग्राहकांतून खंत व्यक्त केली जात आहे.