शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

संमती नसताना शासनाने घेतल्या ताब्यात जमिनी

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्‍यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे.

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्‍यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, निम्न दुधना प्रकल्पातील कालव्यातील जाणार्‍या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे द्यावा यासाठी २००९ पासून माकप व किसान सभेचे कॉ.रामेश्वर पौळ, लिंबाजी कचरे, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, धोंडीराम पौळ, लक्ष्मणराव मुळे, माणिक मुळे, हिंमतराव बारहाते, ज्ञानेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे. प्रशासनाने वेळोवेळी दबावतंत्राचा वापर करुन काही शेतकर्‍यांना केवळ ४८ हजार रुपये प्रति एकर मावेजा देऊन संमत्या घेतल्या. परंतु, बर्‍याच शेतकर्‍यांनी आजपर्यंत संमती दिली नाही व मावेजाही घेतला नाही. या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या समवेत अनेकवेळा बैठका झाल्या. केंद्र शासनाच्या २०१३ च्या भूमी अधिग्रहणाचा नवीन कायदा जानेवारी २०१४ पासून लागू झाला. या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या तीनपट रक्कम शेतकर्‍यांना जमिनीची किंमत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार मार्च २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या शेतकर्‍यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली नाही अथवा मावेजा घेतला नाही, अशा शेतकर्‍यांना नवीन कायदा लागू करा, असा आदेश असताना निम्न दुधना प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना नवीन कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. याउलट ८ मे २०१४ रोजी रात्री डिग्रस व इरळद या परिसरात १४४ कलम लावून शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या दडपशाहीच्या जोरावर अधिकार्‍यांनी काम सुरु करुन शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. याप्रकरणी संमती नसताना जमिनी ताब्यात घेणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, जमिनीची किंमत अत्यल्प दिली जात आहे. त्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. आज या जमिनीचा बाजारभाव एकरी १५ लाख रुपयांपेक्षा जास्त असताना सरकार केवळ ४८ हजार रुपये प्रतिएकर देऊन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार बाजारभावाच्या तीनपट जमिनीला मोबदला द्यावा, परिसरात लागू केलेले १४४ कलम रद्द करावे आदी मागण्या माकप व किसान सभेने केल्या आहेत.