शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘कयाधू’चे लोकसहभागातून पुनरुज्जीवन, हिंगोली जिल्ह्यात जलचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 04:41 IST

पावसाळ्यात पुराचे आक्राळ-विक्राळ रूप दाखविणारी हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी दुसऱ्याच दिवशी कोरडीठाक होते, त्यामुळे पुराचा सामना करूनही कायम दुष्काळछायेत जगणाºया या जिल्ह्याने लोकसहभागातून त्यावर मात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य पात्राला धक्का न लावता त्याच्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही मोहीम राबविली जाणार आहे.

- गजानन दिवाणऔरंगाबाद  - पावसाळ्यात पुराचे आक्राळ-विक्राळ रूप दाखविणारी हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी दुसऱ्याच दिवशी कोरडीठाक होते, त्यामुळे पुराचा सामना करूनही कायम दुष्काळछायेत जगणाºया या जिल्ह्याने लोकसहभागातून त्यावर मात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य पात्राला धक्का न लावता त्याच्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही मोहीम राबविली जाणार आहे.वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील अगरवाडी-कंकरवाडी येथे कयाधू नदीचा उगम झाला आहे. तेथून पायथ्यापर्यंत ही मोहीम राबविली जाईल. ही नदी हिंगोलीतून ८४ किलोमीटर प्रवास करते. ११७५ कि.मी. अंतरावरून लहान-मोठे ओढे, नाले आणि पाट नदीला येऊन मिळतात. नदीच्या काठावर जवळपास १५४ गावे, वस्त्या, वाड्या वसल्या आहेत. चार हजार ८३२ कुटुंबे आणि त्यातील दोन लाख ४२ हजार १५२ लोकसंख्येला, शिवाय एक लाख १३ हजार १०० हेक्टर जमिनीला ही नदी प्रभावित करते. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे एरव्ही बारा महिने वाहणारी कयाधू नदी आता हंगामी झाली आहे. परिणामी शेतीला फटका बसून आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळी जिल्ह्यात हिंगोलीचे नाव समाविष्ट झाले आहे. कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करुन जिल्ह्याला दुष्काळचक्रातून बाहेर काढण्यासाठी ईडलग्रीव्ह फाऊंडेशनच्या मदतीने उगम संस्थेने वर्षभर ५० जणांच्या पथकाद्वारे जिल्ह्यात प्राथमिक सर्वेक्षण केले. त्यातील निरीक्षणानुसार लोकसहभागातून हे काम केले जाणार असल्याचे ‘उगम’चे अध्यक्ष जयाजीराव पाईकराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सद्य:स्थितीत २२४ कि.मी. खोलीकरण झाले आहे. नवीन कामांमधून होणारे खोलीकरण २३५ कि.मी. असून, ६८८ कि.मी. खोलीकरण करावे लागणार आहे.अडीच लाख लोकांना लाभ१५४ गावांमध्ये ४८ हजार ३३२ कुटुंबे राहतात. ही लोकसंख्या दोन लाख ४२ हजार ५१२ आहे.दोन गावे बदलली; आता १५४ गावे बदलणार!उगम ग्रामीण विकास संस्थेने दोन वर्षांपूर्वी आमदरी (ता. औंढा नागनाथ), तेलंगवाडी (ता. कळमनुरी) गावांचा कायापालट केला. आता १५४ गावांचा विकास करण्याचे पाऊल लोकसहभागातून उचलण्यात आले आहे.या दोन्ही गावांत जलसंधारणाची कामे झाल्यानंतर केलेल्या पाहणीत विहीर, बोअरची पाणीपातळी वाढली. जमिनीची सुपीकता वाढली आहे. टँकरशिवाय उन्हाळा न जाणाºया या गावांत आता औषधालाही टँकर येत नाही.कामे होण्याआधी दोन्ही गावांत ७० टक्के कुटुंबे वर्षाला खरिपाचे साधारण १० क्विंटल पीक काढायचे. जलसंधारणानंतर २७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न ४२ टक्क्यांनी वाढले आहे. रबीचे ६१ टक्के लोकांचे उत्पन्न ४९ टक्क्यांनी वाढले आहे. गावातील प्रति कुटुंब वार्षिक उत्पन्न साधारण ४२ टक्क्यांनी वाढून ६६ हजारांवर पोहोचले आहे.कोअर टीम : हिंगोलीकराच्या कोअर टीममध्ये उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजीराव पाईकराव, डॉ. प्रेमेंद्र बोथरा, डॉ. संजय नाकाडे, डॉ. सत्यनारायण तापडिया, रत्नाकर महाजन, प्रकाश इंगोले, प्रकाश सनपूरकर, प्रकाश सोनी, आशिष वाजपेयी, सुनील पाठक, अभय भारतीय आदींचा समावेश आहे.काय केले जाणार? पाणलोट क्षेत्रातील जुने पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे. सीसीटी, लूट बोल्डर, गॅबियन बंधारे बांधणे. बुडी, डोह पुनरुज्जीवित करणे. जुने सिमेंट बांध, मातीबांध यांची दुरुस्ती व खोलीकरण करणे. शेततळे घेणे, बोअर पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे. ओढ्याचे खोलीकरण करणे 

टॅग्स :WaterपाणीriverनदीMaharashtraमहाराष्ट्र