शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत खडाजंगी

By admin | Updated: May 19, 2015 00:53 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अजूनही रखडलेल्याच कशा, ‘कॉन्टीजन्सी’च्या रकमेचा ताळेबंद नाही,

औरंगाबाद : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अजूनही रखडलेल्याच कशा, ‘कॉन्टीजन्सी’च्या रकमेचा ताळेबंद नाही, सिंचन विभागातील काही योजनांच्या कामांची बिले अखर्चित असतानादेखील ती खर्च झाल्याचे पत्र देऊन शासनाची फसवणूक का केली, या सर्व प्रश्नांवर स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष आणि सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सोमवारी दुपारी २ वाजता जि. प. सभागृहात अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक सुरू झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा आदींसह विविध विभागांचे प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. सदस्य रामदास पालोदकर यांनी सभागृहासमोर सुरुवातीला निविदा प्रक्रिया राबविताना कंत्राटदारांकडून २ किंवा ३ टक्के ‘कॉन्टीजन्सी’ रक्कम घेण्याचा नियम आहे. मात्र, सिंचन तसेच बांधकाम विभागाने या रकमेचा ताळेबंद ठेवलेला नाही, असा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की, हस्तांतरित योजना राबविण्यासाठी काही डाक्युमेंटरी खर्च येतो, त्यासाठी योजनेवर खर्च केल्या जाणाऱ्या निधीतील ३ टक्के रक्कम ‘कॉन्टीजन्सी’ म्हणून बाजूला ठेवली जाते. त्यानंतर पालोदकर यांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला की, सिंचन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’ची ८४ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम दोन वर्षांपासून अखर्चित आहे. तरीदेखील सिंचन विभागाने सदरील रक्कम खर्च झाल्याचे उपयोगिता प्रमाणत्र मुख्य अभियंत्यांना दिले आहे. अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे शासनाची दिशाभूल का केली, यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह पालोदकर यांनी धरला. त्यावर अध्यक्ष महाजन यांनी पुढच्या बैठकीत या विषयावर चर्चा करू, असे सांगून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला; पण पालोदकर ऐकत नव्हते. त्यानंतर सदस्य अनिल चोरडिया व अन्य दोघांनी हाच मुद्दा पुढे रेटला. तेव्हा दोन दिवसांत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगून हा मुद्दा निकाली काढला. महिला- बालकल्याण, समाजकल्याण विभागाच्या योजना अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत. तेव्हा अधिकाऱ्यांनी यादी परिपूर्ण नसल्याचे सांगितले. तेव्हा सदस्यांनी त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांना वगळून अन्य लाभार्थ्यांना वेठीस का धरता, असा प्रश्न केला.