खाम नदी सिव्हरेजमुक्त करण्याची गरज

By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:40:15+5:302014-09-04T00:55:36+5:30

नजीर शेख, औरंगाबाद सिव्हरेजचे पाणी आणि मैला नाल्यात आणि त्याद्वारे नदीत सोडणारे कदाचित औरंगाबाद हे एकमेव शहर असेल

Kham river need to be free of sewerage | खाम नदी सिव्हरेजमुक्त करण्याची गरज

खाम नदी सिव्हरेजमुक्त करण्याची गरज

नजीर शेख, औरंगाबाद
सिव्हरेजचे पाणी आणि मैला नाल्यात आणि त्याद्वारे नदीत सोडणारे कदाचित औरंगाबाद हे एकमेव शहर असेल. यामुळे शहरातील नाले आणि खाम नदी दुर्गंधीयुक्त झाली असून खाम नदी सिव्हरेजमुक्त करण्याची गरज असल्याचे मत, अकोला अर्बन बँकेचे चेअरमन पुरुषोत्तम हेडा यांनी व्यक्त केले.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात त्यांनी आपली मते मांडली. पाणी आणि सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट याबाबत आपण फारसे गंभीर नाही, असे चित्र आहे. शहरातील मैला वाहणाऱ्या वाहिन्या आपण नाल्यातून आणि खाम नदीतून नेल्या आहेत. फुटलेल्या वाहिन्यांमुळे हा मैला नदीत आणि नाल्यांत मिसळतो. अतिक्रमण आणि प्रदूषण यामुळे खाम नदी ‘गंदा नाला’ बनली आहे. आपल्याकडे एक गंमतच आहे असे म्हणावे लागेल. शहरातील नाल्यांचे पाणी आणि खाम नदीचे दूषित पाणी पुढे जाऊन ब्रह्मगव्हाणजवळ जायकवाडी धरणाच्या पाण्यात मिसळते. आपण पुन्हा जायकवाडीचे शुद्ध पाणी शहरात आणतो. देशामध्ये आता गंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीचा विषय चर्चिला जात आहे. आपणही आपल्या गावातील नदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी का प्रयत्न करू नयेत. आपण याचे मायक्रोबायोलॉजिकल विश्लेषण केले तर आपल्याला धक्कादायक गोष्टी आढळून येतील. शहरातील मैला वाहून जाण्यासाठी आणि ट्रीटमेंट प्लांटसाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे. शहरातील नाल्यांची दुर्गंधी जीवघेणी आहे. तरीही काही लोक याठिकाणी राहतात. खरे तर पर्यटन राजधानी असलेल्या आपल्या शहरात दुर्गंधीचे असे साम्राज्य असणे चांगली गोष्ट नाही. शासनाकडून विविध योजनांसाठी पैसा येतो. तो जातो कुठे, असाही प्रश्न आहे. खाम नदीच्या तीरावर औरंगाबाद शहर वसले आहे, हे नदीचा गंदा नाला झाल्यानंतर आपल्याला कसे सांगता येईल. कोणत्याही परिस्थितीत सिव्हरेजचे पाणी नाल्यात किं वा खाम नदीत मिसळले जाता कामा नये.
पाण्याचे ओहोळ जपले पाहिजेत
शहरीकरणामध्ये आपण पाण्याचे ओहोळ दुलर्क्षित करून चालणार नाही. सध्या डीएमआयसीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. या जमिनीच्या ठिकाणी असलेले नैसर्गिक प्रवाह, नाले, लहान बंधारे याबाबत विचार व्हायला हवा.
उद्योगांसाठी आपण जमीन सपाटीकरण करीत असताना या प्रवाहांचा विचार करायला हवा, असे मला वाटते. शहरीकरणामध्येही ‘वॉटर बॉडीज’ टिकल्या पाहिजेत. पाण्याचे निसर्गनिर्मित असलेले स्रोत आणि प्रवाह महत्त्वाचे असतात. असे प्रवाह न करता पाणी त्याच ठिकाणी जिरले पाहिजे, अशी यंत्रणा निर्माण करता येऊ शकते. औद्योगिकीकरणासाठी या पाण्याचा मोठा हातभार लागू शकतो.
आम्ही जटवाडा परिसरात पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास करून बंधाऱ्यांचे काम केले आहे. पर्जन्यमान कमी असलेल्या आपल्या प्रदेशात आपण पाण्याच्या स्रोताबाबत गंभीर होण्याची गरज आहे. पाणी आणि सिव्हरेज याबाबत आपल्या शहरात चिंतन होण्याची गरज आहे.

Web Title: Kham river need to be free of sewerage