शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त मोहिमेस धार हवी

By admin | Updated: June 29, 2014 00:44 IST

जालना : शहरातील विविध रस्ते व चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसोबतच पायी चालणे जिकिरीचे होऊन बसले आहे.

जालना : शहरातील विविध रस्ते व चौकात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसोबतच पायी चालणे जिकिरीचे होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखा व नगरपालिकेने काही अतिक्रमणे काढली खरी; परंतु दोन दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे.थातूरमातूर अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे काहीही साध्य झाल्याचे दिसत नाही. वाहतूक पोलिस व नगरपालिकेच्या तकलादू धोरणामुळे जनतेचे हाल होत आहेत. शहरातील बहुतांश रस्ते व चौक अतिक्रमणाने अक्षरश: व्यापून गेले आहेत. अनेक वर्षांपासून थाटलेले अतिक्रमण कायमस्वरुपी काढणे नितांत गरजेचे आहे; परंतु या प्रकाराकडे नगरपालिकेसह व वाहतूक पोलिसांचे काडीचेही लक्ष नाही. .जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले खरे, आठ दिवसांतच परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली आहे. वीर सावरकर चौक, लतिफ शहा बाजार, नूतन वसाहत, बसस्थानक, मामा चौक, सराफा, फुल बाजार, शिवाजी पुतळा, भोकरदन नाका, औरंगाबाद चौफुली, आझाद मैदान, शनि मंदिर चौक रस्ते तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. याचा त्रास सर्व जनतेला होत आहे.वाहतुकीसाठी रस्ता मोकळा असणे गरजेचे असतानाही अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद बनले आहेत. अनेकदा गर्दीमुळे अपघातही होतात. या भागात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सुरूवातीला नागरिकांना काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात आले नाही. विशेष म्हणजे विक्रेत्यांना अनेकदा सूचना तसेच पत्र देऊनही उपयोग होत नसल्याचे चित्र हमखास पहावयास मिळते. जुना जालन्यातील सर्वात जुनी भाजीमंडई म्हणून बाजार चौकी परिसराची ओळख आहे. मात्र अनेक दिवसांपासून या भागात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे येथे सतत रहदारी ठप्प होते. या अतिक्रमणांचा त्रास रहदारीला तर होतोच, परंतु बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही होतोशहरातील अतिक्रमणाकडे प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आलेले आहे. एक-दोन वेळा ही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र तेथे पुन्हा अतिक्रमणे थाटण्यात आली. नगरपालिकेने यापूर्वी सदर भागातील अतिक्रमणे हटविण्याचे जाहीर करते. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने अतिक्रमणकर्त्यांचे फावत आहे. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)पालिकेकडून ट्रॅक्टर नसल्याचे कारणनगरपालिकेकडे मनुष्यबळासह साधनांची टंचाई असल्याने अतिक्रमण मोहिमेवर मर्यादा येत आहेत. विशेषत: मलबा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वेळेस ट्रॅक्टरसह इतर साधने नसल्याने मोहीम अनेकदा स्थगित करावी लागत असल्याचे चित्र आहे.नगरपालिका अतिक्रमण काढल्यानंतर त्या परिसराकडे ढुंकूनही पाहत नाही. परिणामी, तेथे पुन्हा अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण काढताच तेथे तात्काळ रुंदीकरण करुन रस्ता अथवा पदपाथ निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरुन पुन्हा अतिक्रमण करण्याची संधी व्यावसायिकांना मिळणार नाही. नगरपालिकेने विशेष पथकाची स्थापना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.