शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

माध्यमांच्या संकुचित दृष्टिकोनामुळे चिघळला एनआरसीचा मुद्दा - मेघना ढोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:44 IST

राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी आसामातील स्थानिक नागरिकांची मनोभूमिका समजूून घेण्याकडे केलेले दुर्लक्ष व तेथील स्थानिक माध्यमे अतिसंवेदनशील झाल्याने त्यांना त्यांच्या व्यथा देशपातळीवर नेण्यात आलेल्या मर्यादेमुळे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा चिघळला.

औरंगाबाद : राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी आसामातील स्थानिक नागरिकांची मनोभूमिका समजूून घेण्याकडे केलेले दुर्लक्ष व तेथील स्थानिक माध्यमे अतिसंवेदनशील झाल्याने त्यांना त्यांच्या व्यथा देशपातळीवर नेण्यात आलेल्या मर्यादेमुळे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मुद्दा चिघळला. ३.१९ कोटी आसामी नागरिकांच्या आयुष्यात यामुळे काय घडले, याकडे माध्यमांनी लक्षच दिले नाही, असे निरीक्षण ‘लोकमत’च्या मुख्य उपसंपादक मेघना ढोके यांनी शनिवारी येथे नोंदविले.ग्रंथाली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दिली जाणारी अरुण साधू पाठ्यवृत्ती येथील एमजीएम संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, खा. कुमार केतकर व ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते मेघना ढोके यांना प्रदान करण्यात आली. या पाठ्यवृत्तींतर्गत मेघना ढोके यांनी गेले वर्षभर ‘एनआरसी’वर केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष व त्यांची निरीक्षणे यावेळी जाहीर केली. त्या म्हणाल्या, बांगलादेशातून १९७१-७२ नंतर जे लोंढे भारतातील आसामात आले, त्याविरुद्ध १९८० पासून ओरड सुरू झाली. २०१४ मध्ये केंद्र सरकारने एनआरसीचा निर्णय घेतला. एनआरसी म्हणजे बांगलादेशींना परत पाठविणे नाही तर केवळ आसामातील रहिवाशांचे नागरिकत्व पडताळणी आहे. नागरिकत्वाची पहिली यादी तयार झाली तेव्हा त्यात ४० लाख आसामी नागरिकांना त्यांचे भारतीयत्व सिद्ध करता आले नाही. दुसऱ्या यादीत ही संख्या १९ लाख एवढी असून त्यातील १४ लाख हे हिंदू आहेत.त्या पुढे म्हणाल्या की, परिस्थिती अशी असताना माध्यमांनी हा मुद्दा हिंदूविरुद्ध मुस्लिम असा पेटविला. मुळात येथे हिंदू-मुस्लिम असा प्रश्नच नव्हता. बंगालीविरुद्ध आसामी अर्थात स्थानिक कोण व बाहेरचे कोण, असे हे भांडण आहे. नागरिकत्व सिद्ध करणाºयासाठी धडपडणाºया या नागरिकांच्या आयुष्यात काय घडत होते. मात्र, याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. जो तो कागदावरील थेअरी मांडत होता; परंतु जेव्हा मी या नागरिकांच्या अंतरंगात डोकावले तेव्हा परिस्थिती वेगळीच दिसली. येथे नागरिकांचे अनेक व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार झाले होते. त्यातून कोण कुणाचा, मामा, काका, पुतण्या, भाचा, आजोबा, असे नाते शोधले जात होते. मागच्या अनेक पिढ्यांपासून नोकरीधंद्यानिमित्त इतरत्र पांगलेले नातेवाईक पुन्हा एकत्र आले. समाजात असे अनेक बदल घडत होते. यासह आसामातील अनेक अनुभव ढोके यांनी सांगितले.या अभ्यासासाठी लोकमत समूहाने केलेल्या मदतीचा गौरवपूर्ण उल्लेखही ढोके यांनी केला. पाठ्यवृत्तीचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे आणि प्रा. जयदेव डोळे यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर एमजीएमचे सरचिटणीस अंकुशराव कदम, ग्रंथालीच्या अरुणा साधू, पद्मभूषण देशपांडे, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, एमजीएम पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. रेखा शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावर्षी दोघांना पाठ्यवृत्तीआगामी वर्षासाठी दोन पत्रकारांची पाठ्यवृत्तीसाठी निवड झाल्याची घोषणा डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी केली. त्यात पत्रकार दत्ता जाधव व मुक्ता चैतन्य यांचा समावेश आहे. जाधव हे गोवंश हत्याबंदी व त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणामाचा अभ्यास करणार आहे. मुक्ता चैतन्य पोर्नोग्राफीचा बालकांवर होणारा परिणाम अभ्यासणार आहेत. 

टॅग्स :AssamआसामAurangabadऔरंगाबाद