शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: September 10, 2014 00:00 IST

परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली आहे.

परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची चिंता काहीअंशी कमी झाली आहे.
या पावसाळी हंगामात जिल्ह्यात संकटाची स्थिती निर्माण झाली होती. दोन - अडीच महिने विनापावसाचे गेल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली. पाण्याचा मोठा प्रश्न उभा टाकला. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचीही समस्या निर्माण झाली होती. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने राज्य शासनाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश झाला. दडी मारुन बसलेल्या पावसाने आॅगस्टच्या शेवटच्या टप्प्यात आगमन केले. त्यामुळे हळूहळू नागरिकांना दिलासा मिळत गेला. खरीप हंगामातील पिके धोक्यात असतानाच या पावसाने जीवदान दिले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत अल्पशी वाढ झाली आहे. येलदरी धरणात खडकपूर्णा धरणातून पाण्याची आवक होत असल्याने या धरणाची पाणीपातळी वाढत आहे. सध्या या धरणामध्ये ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सेलू तालुक्यातील निम्नदुधना प्रकल्पातही बऱ्यापैकी पाणीसाठा झाला असून ७५ टक्के पाणी या धरणात उपलब्ध आहे. गंगाखेड तालुक्यात मासोळी मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये सध्या ७.१४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. २७.३३ दलघमी या प्रकल्पाची क्षमता असून २७ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस झालेल्या पावसामुळे या प्रकल्पात दोन टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. (प्रतिनिधी)
४४ टक्के पाऊस
जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी पाण्याचे संकट निवारणारा ठरला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. असून आतापर्यंत ३३७.०६ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक ४२१.४४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर पालम तालुक्यात सर्वात कमी २३८ मि.मी.पाऊस झाला. रविवारी जिल्हाभर पावसाची संततधार होती. या दिवशी जिल्ह्यात १४.९७ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस जिंतूर तालुक्यात ३०.८३ मि.मी. पाऊस एवढा झाला.
येलदरीच्या पाणीसाठ्यात वाढ
येलदरी- बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून ९ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत येलदरी जलाशयात ५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पूर्णा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.
पोळ्याच्या दिवशी येलदरी परिसरात तब्बल १३१ मि.मी. पाऊस झाला आणि नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या. १ सप्टेंबरपासून धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणाच्या नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार १ सप्टेंबर रोजी या धरणात ३४६ दलघमी म्हणजे ४२ टक्के पाणीसाठा होता. मात्र खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे सध्या ४४८ दलघमी (५६ टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे.
धरण परिसरात आजपर्यंत ५७३ मि.मी.पाऊस झाला. गतवर्षी याच तारखेला ९०५ मि.मी. पाऊस झाला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अजूनही पावसाची अपेक्षा आहे. येलदरी धरणावरुन परभणी, नांदेड, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील शेकडो गावांचा पाणीपुरवठा होतो. धरण भरत असल्याने या गावातील पाणीप्रश्न सुटणार आहे.