शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
3
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
4
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
5
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
6
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
7
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
8
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
9
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
10
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
11
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
12
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
13
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
14
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
15
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
16
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
17
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
18
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
19
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
20
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर प्लॉट; नागरिकांना दिलासा

By admin | Updated: September 12, 2014 00:04 IST

हिंगोली : शहरात नगरविकास आराखड्यानुसार आरक्षित जागेवर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची विक्री करीत नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर खंडपिठातसुनावणी झाली.

हिंगोली : शहरात नगरविकास आराखड्यानुसार आरक्षित जागेवर बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची विक्री करीत नागरिकांची फसवणूक झाल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर औरंगाबाद खंडपिठात गुरूवारी अंतिम सुनावणी झाली. त्यात बहुतांश बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्यासंदर्भात नगर परिषदेला निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
१९९४ साली हिंगोली शहराचा नगर विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यात वेगवेगळ्या उपयोगासाठी विविध प्रकारचे आरक्षण ठेवण्यात आले होते. पुढील २० वर्षातील लोकसंख्या वाढ लक्षात घेवून हे आरक्षण केले होते. मात्र सदरील आरक्षित जागेवर बेकायदेशीरित्या ‘एनए लेआऊट’ न करता व जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता प्लॉट पाडून त्याची विक्री करीत लोकांची फसवणूक करण्यात आली, या आशयाची जनहित याचिका तुकाराम झाडे यांनी १९९८ मध्ये न्यायालयात दाखल केली होती. त्यावर अनेक वेळा सुनावणी झाली. दरम्यान, गुरूवारी औरंगाबाद खंडपीठात झालेल्या अंतिम सुनावणीमध्ये बेकायदेशीर प्लॉट प्रकरणात न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंगोली शहरातील आजम कॉलनी, शिवराज नगर, खुशाल नगर, इंदिरा नगर, साई नगर, खाजा कॉलनी, फ्रेन्डस् कॉलनी आदी भागातील प्लॉटच्या कायदेशीर बाबीसंदर्भात न्यायालयात प्रकरण चालू होते. त्यामुळे या भागातील नागरिक मुलभूत सोई-सुविधांपासून वंचित होते. आता खंडपिठाने नगर परिषदेला त्या अनुषंगाने काही निर्देश दिले आहेत. २००१ च्या गुंठेवारी अधिनियमाप्रमाणे ज्या-ज्या नागरिकांना रेग्युलराईज (नियमित) करता येते, त्यांना नियमित करण्यासंदर्भात न.प.ने निर्णय घ्यावा. ज्यांना नियमित करता येणार नाही त्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात एक वर्षाच्या आत कोणती कार्यवाही केली, त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा, असे निर्देशात म्हटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयुक्त, जिल्हाधिकारी, न.प.चे मुख्याधिकारी, नगर विकास सचिव यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. खटल्यात न. प. तर्फे अ‍ॅड. सचिन देशमुख, अ‍ॅड. एस. एस. चौधरी, नागरिकांतर्फे अ‍ॅड. हमजाखान, अ‍ॅड. सुनील दरगड, अ‍ॅड. पवन अग्रवाल, अ‍ॅड. अखील अहेमद, अ‍ॅड. एस. टी. शेळके यांनी काम पाहिले. तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक शेख शकील, शेख निहाल, महमंद खालीद, शेख नईम यांनीही नागरिकांच्या बाजूने सदर प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
या संदर्भात नगरसेवक शेख निहाल यांना विचारले असता, औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय बहुतांश प्लॉटधारक नागरिकांच्या हिताचा आहे. बेकायदेशीर बांधकाम झालेल्या वसाहतीत खाजगी मालमत्ता असल्याने न्यायालयाने त्या संदर्भात न. प. ला अधिकार देवून कायदेशीर कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)