शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाख ८८ हजार मतदारांकडे ओळखपत्रे

By admin | Updated: September 22, 2014 01:19 IST

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत.

औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात २४ लाख ४४ हजार मतदारांपैकी २३ लाख ८८ मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. जिल्ह्यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९९.८५ टक्केमतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. तर पैठण मतदारसंघात सर्वात कमी ९६ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत एकूण २४,४४,१९७ मतदार आहेत. यापैकी २३,८८,८१८ जणांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. निवडणूक आयोगातर्फे मागील महिनाभरात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नोंदणी मोहिमेंतर्गत ३० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. या सर्वांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली असून, त्यांनाही लवकरच घरपोच मतदार ओळखपत्रे वाटप केली जाणार आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात २ लाख ७७ हजार मतदारांपैकी २ लाख ७२ हजार मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. फुलंब्री मतदारसंघातही ९८.३३ टक्के मतदारांना ओळखपत्रे मिळाली आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २ लाख ७५ हजार मतदारांपैकी २ लाख ७४ हजार मतदारांकडे ओळखपत्रे आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात ९६.६४ टक्के, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ९७.२४ टक्के तसेच पैठण मतदारसंघात ९७.६० टक्के, गंगापूर मतदारसंघात ९६.७० टक्के आणि वैजापूर मतदारसंघात ९६.९५ टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्रे आहेत. मतदारांसाठी हेल्पलाईन तक्रार निवारण कक्षऔरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी औरंगाबादच्या जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात मतदारांसाठी हेल्पलाईन व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता भंगविषयक व निवडणूक खर्चविषयक तक्रार असल्यास नागरिकांना ती हेल्पलाईनवर नोंदविता येणार आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला आहे. हा टोल फ्री क्रमांक १८००२३३९२३४ असा असून, सदरचा कक्ष निवडणूक काळात २४ तास सुरू राहणार आहे. एम. ए. सय्यद हे या कक्षाचे नोडल आॅफिसर आहेत. तसेच एस. टी. पोफळे, एस. के. काशीद, राहुल राऊत, एम. टी. शेख, दीपक देशमुख इत्यादी कर्मचाऱ्यांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजीविधानसभा निवडणूक चांगल्याप्रकारे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी घेतले जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतील मतदान प्रक्रियेसाठी तब्बल १६ हजार कर्मचारी लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात येत असून, त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिले प्रशिक्षण २ आॅक्टोबर रोजी, दुसरे ९ आॅक्टोबर आणि तिसरे १४ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल. तसेच मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक ११ आणि १२ आॅक्टोबर रोजी घेण्यात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.व्हॉटस्अपवर बदनामीकारक मजकूर टाकणाऱ्याला अटकऔरंगाबाद : महायुतीच्या नेत्यांबाबत व्हॉटस्अपवर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी एका आरोपीला अटक केली. व्हॉटस्अपच्या एका ग्रुपवर काल एका तरुणाने महायुतीच्या नेत्यांबाबत बदनामीकारक मजकूर टाकला. ही बाब लक्षात येताच राजेंद्र साबळे यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविल्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी तो मजकूर टाकणाऱ्या तरुणाचा मोबाईल क्रमांकावरून शोध घेतला.