शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

Marathawada Muktisangram Din : मराठवाड्याचा अनुशेष एक यक्षप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 12:12 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होणे नाही.

डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी खासदार

15 आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु निजामाच्या जोखडातून सुमारे १ वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.भाषिक एकात्मतेसाठी विदर्भ व मराठवाड्याने महाराष्ट्रात सामील होण्याचे ठरविले़ १९५३ ला नागपूर करार झाला़ मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला लोकसंख्येच्या प्रमाणात विकास क्षेत्रात न्याय मिळावा या दृष्टीने या करारात तरतूद होती़ विदर्भातील नेत्यांच्या रेट्यामुळे नागपूर कराराला घटनात्मक संरक्षण मिळावे म्हणून घटनेत कलम ३७१ (२) हे कलम १९५६ साली अंतर्भूत करण्यात आले़ विदर्भ व मराठवाडा या मागासलेल्या विभागांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे स्पष्ट आश्वासन १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी विधिमंडळात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिले़ गेल्या ६ दशकांच्या विकासाचा आलेख पाहिला तर हे आश्वासन पाळले गेले असे दिसत नाही़ पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या विभागातील विकासाचा असमतोल वाढत गेला आहे़ पश्चिम महाराष्ट्रातील धुरंधर नेत्यांनी विकासनिधी आपल्याच भागाकडे खेचून नेला व त्यामुळे मराठवाड्यातील अनुशेष वाढत चालला आहे. १९८३ साली अर्थशास्त्रज्ञ दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली़ १९८४ साली दांडेकर समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला़ तेव्हा कुठे मराठवाडा व विदर्भाच्या अनुशेषाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली़ समितीने उद्योग, शिक्षण, रोजगार, दळणवळण, सिंचन इत्यादी क्षेत्रातील अनुशेष (शास्त्रशुद्ध पद्धतीने विकासाचे मापदंड ठरवून) काढला व तो भरून काढण्यासाठी उपायही सुचविले.

 शासनाने काही जुजबी तरतुदी केल्या़; परंतु मूळ शिफारशींकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे हा अनुशेष वाढत गेला. सत्यशोधन समितीने १९८४ साली काढलेला अनुशेष ३१८६ कोटी रुपये एवढा होता. तो अनुशेष व निर्देशांकच अनुशेष समितीच्या अहवालाप्रमाणे १९९४ साली १५३५५ कोटी रुपये एवढा निघाला. दांडेकर समितीच्या शिफारशी डावलून १९८५ ते २००३-०४ या १९ वर्षांत विकास योजनेत हक्काची १४०५०़९३ कोटींची तरतूद असताना १०७४५़८१ कोटी एवढाच खर्च केला गेला़ २००४-०५ या वर्षात अनुशेष दूर करण्यासाठी नियोजित केलेल्या रकमेच्या ८़४ टक्के एवढाच खर्च केला व उरलेली रक्कम पश्चिम महाराष्ट्राकडे वळविली़ १ एप्रिल १९९४ रोजीचा वित्तीय अनुशेष २००१ नंतर राज्यपालांनी निदेश देऊन हा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला़ २०११ मध्ये हा अनुशेष भरून निघाला असा शासनाचा दावा आहे़; मात्र १९९४ नंतर आजतागायत निर्माण झालेल्या अनुशेषाचे काय? हा प्रश्न कायम राहतोच.

‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा’ असे अभिमानाने म्हणावयाचे तर अनुशेषाचा यक्ष प्रश्न सोडवावाच लागेल.

आजपर्यंत मराठवाड्याला काय मिळाले यावर चर्चा करण्यापेक्षा आगामी काळात मराठवाड्याच्या विकासासाठी काय केले पाहिजे याची चर्चा करणे अधिक संयुक्तिक ठरेल. दुष्काळमुक्ती लढाईची सुरुवात सर्वप्रथम करावी लागणार आहे.-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

 

 

 

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा