शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा कोलमडली

By admin | Updated: June 4, 2014 23:56 IST

जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा खेळंबा झाला आहे. या संपात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य

वर्धा :  जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा खेळंबा झाला आहे. या संपात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ ‘मॅग्मो’ संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी यासाठी २ जूनपासून बेमूदत संप पुकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आश्‍वासन देऊनही मागण्यांची पूर्तता केली नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांनी संपाचे हत्यार उपसल्याचे संघटनेचे अधिकारी सांगत आहेत. सन २00९-१0 मध्ये समावेशन झालेल्यांना पूर्ववक्षी प्रभावाने लाभ मिळावा, अस्थाई ७८९ बीएएमस वैद्यकीय अधिकारी व ३२ बीडीएम दंत तज्ज्ञाना कायम करावे १ जानेवारी २00६ पासून वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन अयोग लागू करावा. राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना केंद्र शासनाप्रमाणे व वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळावे, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकार्‍यांना खातेअंतर्गत पदोन्नतीचा मार्ग द्यावा, वैद्यकीय अधिकार्‍यांची ज्येष्ठता यादी तयार करावी, कामाचे तास निश्‍चित करावे. व्यवसायरोध भत्ता ऐच्छीक असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमास असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना व्यवसायरोध भत्ता मिळावा, वैद्यकीय अधिकार्‍यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पाठविण्याकरिता आदर्श धोरण ठरविण्यात यावे, वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांना तीन व सहा आगावू वेतनवाढी देण्यात याव्या व सेवानवृत्तीचे वय ६२ करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यासाठी वारंवार शासनदरबारी पाठपुरावा करूनही आश्‍वासनाशिवाय संघटनेच्या पदरी काहीही पडले नसल्याचे नाईलाजास्तव संप करावा लागल्याचे संघटनेने सांगितले आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता शासनाच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे.  ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.(प्रतिनिधी)