शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर तालुक्यात बारावी परीक्षेत मुलींनी मारली बाजी

By admin | Updated: June 3, 2014 00:42 IST

जिंतूर: तालुक्याचा निकाल ९१.६१ टक्के एवढा लागला असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.११ टक्के तर मुलांचे ९०.५५ टक्के आहे.

जिंतूर: तालुक्याचा निकाल ९१.६१ टक्के एवढा लागला असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.११ टक्के तर मुलांचे ९०.५५ टक्के आहे. तालुक्यातून तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यामध्ये २ हजार १७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार १६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १५२४ विद्यार्थी व ६४५ विद्यार्थिनी आहेत. यापैकी १९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १३८० विद्यार्थी व ६०७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्णाचे प्रमाण विद्यार्थिनीपेक्षा कमी आहे. तालुक्यामध्ये २७ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यापैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ९० टक्केपेक्षा जास्त निकालांच्या शाळा १७ आहेत. तालुक्यामध्ये मुलींचे निकालाचे प्रमाण सलग तिसर्‍या वर्षीही जास्त राहिले आहे. ऊर्दू शाळांमध्ये नॅशनल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय जिंतूरचा ९२ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील केवळ स्वामी विवेकानंद शेवडी वगळता २६ महाविद्यालयांचा निकाल ८० टक्के पेक्षा जास्त आहे. ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय जिंतूर (९२ टक्के), ज्ञानोपासक जिंतूर (९२.२४ टक्के), श्रीमती शकुंतलाबाई कदम कनिष्ठ महाविद्यालय बोरी (९७.१३ टक्के), साईबाबा येलदरी (९४.२९ टक्के), महात्मा फुले वस्सा (९६.८८ टक्के), साईबाबा इटोली (९४.७४ टक्के), संत जनार्दन चारठाणा (९१.९६ टक्के), नॅशनल ऊर्दू जिंतूर (९२ टक्के), बसवेश्वर बोरी (८९.२६ टक्के), स्वामी विवेकानंद जिंतूर (८९.२३ टक्के तालुक्यात सर्वात कमी स्वामी विवेकानंद निवासी शेवडी (३३.३३ टक्के), श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर जिंतूर (८९.१९ टक्के), जवाहर वझर (९७.३० टक्के), छत्रपती शिवाजी (८६.११ टक्के), संत भगवान बाबा इटोली (९७.५० टक्के), संत तुकाराम धानोरा बु. (८९.५३ टक्के), कै. उत्तमराव जोगवाडकर निवासी चारठाणा (९६.१० टक्के), शंकर नाईक गडदगव्हाण (९१.८९ टक्के),ब्रह्मेश्वर बामणी (८०.५८ टक्के), जवाहर जिंतूर (८१.४८ टक्के), शारदा आडगाव (९७.८३ टक्के), विलासराव देशमुख जिंतूर (९७.४४ टक्के), संत तुकाराम जोगवाडा (९० टक्के), ज्ञानोपासक बोरी (८९.५३ टक्के) निकाल लागला आहे. बारावी परीक्षेत निकालाचे प्रमाण मागील तीन वर्षांपासून चांगले राहिले आहे, असे असले तरी विद्यार्थ्यांचे निकालाचे प्रमाण सतत घसरत आहे. अनेक महाविद्यालय केवळ नावालाच सुरू असून गुरुकूल, निवासी शाळांमधून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले जाते, असाच प्रकार जिंतूर तालुक्यातील तीन ते चार महाविद्यालयातून झाला आहे. या महाविद्यालयांचे निकालही चांगले लागले आहेत. काही महाविद्यालयाच्या इमारतीवर केवळ फलक दिसून येतो. विद्यार्थी मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी गुरुकूल किंवा निवासी शाळेत शिकत असल्याचे दिसतात. तालुक्यातील ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूरच्या ४९० पैकी ४५२ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. शकुंतलाबाई बोर्डीकर बोरीच्या १७४ पैकी १६९ विद्यार्थ्यानी, संत जनार्दन चारठाणाच्या १९९ पैकी १८३ विद्यार्थ्यांनी, बसवेश्वर बोरीच्या १४९ पैकी १३३ विद्यार्थ्यांनी, श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर जिंतूरच्या १११ पैकी ९९ विद्यार्थ्यांनी, संत तुकाराम धानोराच्या १७२ पैकी १५४ विद्यार्थ्यांनी, ब्रह्मेश्वर बामणीच्या १२९ पैकी १०६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थी संख्या जास्त असतानाही या महाविद्यालयांनी मिळविलेले यश उज्ज्वल आहे. जिंतूर तालुक्यातील २७ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी तीन शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रभूकृपा वाघी या शाळेचे १७ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साईकृपा बोरीचे पाच पैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कै. गणेशराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय भोगावच्या ९ पैकी ९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या शाळांचा निकाल कागदावर १०० टक्के वाटत असला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. तालुक्यामध्ये सर्वात कमी निकाल स्वामी विवेकानंद निवासी कनिष्ठ महाविद्यालय शेवडीचा लागला असून या महाविद्यालयाने केवळ तीन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविले होते. त्यापैकी केवळ एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला. निकालाचे प्रमाण ३३.३३ टक्के एवढे आहे.